कोकणातील शिमग्यातील वाद
कोकण म्हणजे निसर्गाची पखरण असणारा सह्याद्रीच्या पायथ्याला असलेला आणि
सागराचा तटावर विसावलेला शांत,रम्य प्रदेश.पण हाच कोकण शिमग्यात म्हणजे
होळीकोत्सवात ढवळून निघतो.सारे वर्ष शांत असलेला कोकण या दिवसात एक वेगळाच
चेहरा मोहरा घेऊन येतो.
कोकण म्हणजे निसर्गाची पखरण असणारा सह्याद्रीच्या पायथ्याला असलेला आणि
सागराचा तटावर विसावलेला शांत,रम्य प्रदेश.पण हाच कोकण शिमग्यात म्हणजे
होळीकोत्सवात ढवळून निघतो.सारे वर्ष शांत असलेला कोकण या दिवसात एक वेगळाच
चेहरा मोहरा घेऊन येतो.
कोकणातील होळी उत्सवात ग्रामदेवतांना खूप महत्व असते.वर्षभर देवळांचा गाभाऱ्यात
शांतपणे असणाऱ्या देवता त्यांची रूपे (चांदीचे मुखवटे) पालखीत बसून साऱ्या गावात नाचायला
बाहेर पडतात .सजवलेल्या पालखीत चांदीची रूपे सौभाग्याची लेणी लेऊन सहान म्हणजे गावात
एका विशिष्ट ठिकाणी हि पालखी ठेवतात तो चौथरा तिथे ठेवली जातात.
वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या रूढी आणि परंपरे नुसार होळी साजरी केली जाते.पण काही
रूढी सर्व कडे सारख्याच असतात, सहाने समोर एक आबा किंव्हा माडाचा झाडाचा सरळ उभा खांब
शेंडा पाना-फुलांनी सजऊन एका खड्डया मध्ये उभा करून ठेवण्यात येतो ,त्याला होळी वा माड असे
म्हणतात.हा माड म्हणजे पावित्र्यचे प्रतिक असते.त्यावर देवीचे निशाण लावले जाते.रितीरिवाजा
प्रमाणे कधी पूर्णिमेला,त्रिओदाशीला,तर कोठे प्रतिपदेला सहाने समोर गवताच्या गंजी अथवा लाकडाची
गोलाकार होळी रचण्यात येते.त्या भोवती पालखी फेर धरून ढोल,ताशे,सनहीचा तालावर नाचवली जाते.
५ ते ७ प्रदषिणा पूर्ण झाल्यावर गावाचे मानकरी होळीला अग्नी देतात.सर्व ग्रामस्थ होळीची पूजा करतात
होळीला नारळ अर्पण करतात.नवीनच लग्न झालेली जोडपी मुद्दामून होमात नारळ टाकण्यासाठी आणि
पुढील वैवाहिक जीवनासाठी थोऱ्या मोठांचे आशीर्वाद घेण्या साठी गावी येतात.
पालखी सहाणेवर परत आणली जाते. मग गावातील मानकरी,गावकर,गुरव जशी गावची प्रथा असेल त्या
नुसार देवीला गाऱ्हाणे जाप-जपसाल घातले जातात,तसेच देवीला नवस बोलले जातात आणि नवस फेडले जातात.
शांतपणे असणाऱ्या देवता त्यांची रूपे (चांदीचे मुखवटे) पालखीत बसून साऱ्या गावात नाचायला
बाहेर पडतात .सजवलेल्या पालखीत चांदीची रूपे सौभाग्याची लेणी लेऊन सहान म्हणजे गावात
एका विशिष्ट ठिकाणी हि पालखी ठेवतात तो चौथरा तिथे ठेवली जातात.
वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या रूढी आणि परंपरे नुसार होळी साजरी केली जाते.पण काही
रूढी सर्व कडे सारख्याच असतात, सहाने समोर एक आबा किंव्हा माडाचा झाडाचा सरळ उभा खांब
शेंडा पाना-फुलांनी सजऊन एका खड्डया मध्ये उभा करून ठेवण्यात येतो ,त्याला होळी वा माड असे
म्हणतात.हा माड म्हणजे पावित्र्यचे प्रतिक असते.त्यावर देवीचे निशाण लावले जाते.रितीरिवाजा
प्रमाणे कधी पूर्णिमेला,त्रिओदाशीला,तर कोठे प्रतिपदेला सहाने समोर गवताच्या गंजी अथवा लाकडाची
गोलाकार होळी रचण्यात येते.त्या भोवती पालखी फेर धरून ढोल,ताशे,सनहीचा तालावर नाचवली जाते.
५ ते ७ प्रदषिणा पूर्ण झाल्यावर गावाचे मानकरी होळीला अग्नी देतात.सर्व ग्रामस्थ होळीची पूजा करतात
होळीला नारळ अर्पण करतात.नवीनच लग्न झालेली जोडपी मुद्दामून होमात नारळ टाकण्यासाठी आणि
पुढील वैवाहिक जीवनासाठी थोऱ्या मोठांचे आशीर्वाद घेण्या साठी गावी येतात.
पालखी सहाणेवर परत आणली जाते. मग गावातील मानकरी,गावकर,गुरव जशी गावची प्रथा असेल त्या
नुसार देवीला गाऱ्हाणे जाप-जपसाल घातले जातात,तसेच देवीला नवस बोलले जातात आणि नवस फेडले जातात.
काही गावातील ग्रामस्थ मंडळे या दिवशी सहाणेवर एक सभा आओजीत करतात,सभेत गावातील काही समस्यावर,गावातील विकासाच्या योजनांवर चर्चा होऊन योग्य निर्णय घेतले जातात.उत्साहाचे वातावरण असते. शिमग्याचे काळात देवताच्या शक्ती आणि तेजा मध्ये प्रचंड वाढ होते,त्याचा प्रभाव सर्व कोकणप्रदेशावर झालेला दिसून येतो,अन याच काळात सुरु होते मानापाना वरून अजब नाट्य.गेल्या काही वर्षा पासून कोकणात मानपान, पालखी वाद रंगू लागले आहेत.प्रथेप्रमाणे मागील पिढांचे मानपान वारसा हक्काने पुढील पिढीत चालू राहते. साधारण गावात राजसत्ता बहुदा मराठे जातीचे लोकांकडे असते व पूर्व सत्ता इतरजमाती म्हणजे कुणबी,सुतार,सोनार इ.बारा बलुतेदार यांचे कडे असते.प्रथम पूजेचा मान हा राजसत्ते कडे असतो,त्यांचे कुळातील मानकरी,इतर मराठे घराणी,त्यांचे पाहुणे यांना अग्रक्रम असतो.त्या नंतर इतर बलुतेदार पूजा करतात.हे कित्येक पिढ्या ठरलेले आहे.काही थोड्या गावातून इतर जमाती हि मानाच्या पूजा करतात.काही विशेष मान पण असतात जसे पालखी सजविणे,ती देवळातून प्रथम बाहेर नेणे,गाऱ्हाणे घालणे,प्रथम विडा ठेवणे,पालखी सर्व गावात फिरविणे असे काही मान माराठेतरना देण्यात आले आहेत.
आता तुम्ही म्हणाल यात वादाचा मुद्धा कोठे आला?तर तो मानाचे क्रमवारीत आहे,जाती जमातीतील उच्च
नीचतेत आहे.गावात मराठा समाज हा देवळात अग्रभागी असतो,तेच लोक गाव रहाट सांभाळतात.त्या जातीतील मानकरी मंडळी पूजा, जाप करून कार्याची सुरवात करतात.त्या शिवाय कार्य सुरु होत नाही.हे सर्व मान्य असते.पण काही वेळा असा मान मला का नसावा? मी हि तोलामोलाचा आहे,हुशार,कार्यषम आहे,मग हा मान मला का मिळू नये?अशी मनुष्य सुलभ असूया निर्माण होते,आणि वादाला ठिणगी पडते.
आता तुम्ही म्हणाल यात वादाचा मुद्धा कोठे आला?तर तो मानाचे क्रमवारीत आहे,जाती जमातीतील उच्च
नीचतेत आहे.गावात मराठा समाज हा देवळात अग्रभागी असतो,तेच लोक गाव रहाट सांभाळतात.त्या जातीतील मानकरी मंडळी पूजा, जाप करून कार्याची सुरवात करतात.त्या शिवाय कार्य सुरु होत नाही.हे सर्व मान्य असते.पण काही वेळा असा मान मला का नसावा? मी हि तोलामोलाचा आहे,हुशार,कार्यषम आहे,मग हा मान मला का मिळू नये?अशी मनुष्य सुलभ असूया निर्माण होते,आणि वादाला ठिणगी पडते.
शिक्षण, पैसा,प्रतिष्ठा,राजकारणातील स्थान,समाजातील स्थान याचा वापर होतो वाद कोर्टात जातात. समाज,जात,वाडी,गावकी,भावकी यांचे राजकारण घडऊन सर्व गावात असंतोषाचे वातावरण पसरविण्यात येते.गावात गट पडून लोक इच्छा असो वा नसो विनाकारण या वादात ओढली जातात.त्यामुळे हे उत्सव करण्या मागील जो मूळ उद्देश म्हणजे सर्व गावाने एकत्र येणे,सर्व जाती/जमातींनी बंधुबावाने एकत्र उत्सव साजरा करणे यालाच सुरुंग लागतो..कधी एकाच जातीत म्हणजे मराठा/मराठा,कधी
कुणबी/मराठा अशी वादावादी जुंपते,कधी अग्र पूजेच्या मानावरून,कधी विडा कोणी ठेवावा? कोणत्याही शुल्लक कारणाने वाद चालू होतात.हे वाद न मिटल्याने कधी कोर्टात नेले जातात.काही वर्षानपूर्वी देवीची पालखी किती दिवस भोवती साठी असावी या वरुन कुणबी व मराठे यांत वाद झाला,केस कोर्टात गेली गावातील वातावरण २ वर्षे तंग,शिमगा साजरा झाला नाही.शेवटी कोर्टात निर्णय झाला.पालखी समसमान दिवस दोन्ही समाजाकडे असावी.मधल्या काळात मारामारी,हुल्लडबाजी सर्व गावाचे वातावरण बिघडले. कमी अधिक प्रमाणात हे सर्व कडे पहावयास मिळत आहेआज पर्यत जो बंधुभाव,शांतता जे मागील पिढीने जपले ते सारे संपून लहान सहान गोष्टीवरुन तंटे होऊन पोलीस केस,संचार बंदी लागू होणे अशा मुळे उत्सवावर पाणी पडते.गावात विधायक कामे करणारी मंडळे व सज्जन गावकरी यांचा वेळ व पैसा या वादाने वाया जातो. म्हणजे जे काही थोडे धार्मिक,सामाजिक कार्य कोकणात या मंडळामार्फत होते आहे ते हि बंद पडेल. सामाजिक असंतुलन होऊन समाजकंटक याचा फायदा उठवतील.हे आता थाबविले पाहिजे,कारण उत्सव ४ ते ५ दिवस असतात पण या वादाचे परिणाम वर्षभर भोगावे लागतात,जर कोर्टात केस गेली तर पुढील कित्तेक वर्षे.
या वादांना आळा घालण्यासाठी गावातीलच संबंधित लोकांनी आपल्या सद्सद्विवेक बुद्धीने निरपेक्ष व निर्भीड निर्णय देणे आवशयक आहे.गावातील समाज व्यवस्था,नियम,रूढी,परंपरा परिस्थिती याचे आकलन हे त्यांना असल्याने त्यांचे निर्णय जास्त योग्य असतील.मात्र ते निर्भीडपणे,काळानुरूप,तार्किक (लोजिकल) असणे आवश्यक आहे.असे झाले तर ९० टक्के वाद गावातच मिटतील.आडमुठेपणा झाला तर कोर्ट कचेऱ्या ठरलेल्याच आहेत.पण कोर्टाचा निर्णय योग्य असेलच याचा काहीं नेम नाही,कारण कोर्ट जशी बाजू मांडली जाते त्याचा सारासार विचार करून निर्णय देते.कायधाची चौकट कोर्टाला असतेच .मानसिक पातळीवर रूढी,परंपरा,गाव रहाट याची माहिती कोर्टाला असेलच याची खात्री नाही,असली तरी त्या पातळीवर अभ्यासक पणे निवडा देईल असे नाही.बहुधा जर्ज परप्रांतीय असतात त्यांना या सर्वाची माहिती नसेल तर न्यायात हि अन्याय होऊ शकतो.मग अशा वादात कोर्टात जाऊन उपयोग होत नाही.
म्हणजे असे वाद गावपातळीवर सोडविणे योग्य आहे हे आपल्याला पटेल.कमी वेळात वाद मिटतील
व मने कलुषित होणार नाहीत.रूढी परंपरा आपणच निर्माण केलेल्या असतात,मानपान हे आपणच दिलेले असतात व मान्य केलेलेअसतात.कालानुरूप त्यात बदल होणे अनिवार्य आहे हे हि आपण लक्षात ठेवले पाहिजे.कोणी शिकला पैसेवाला झाला कि त्याला मानाची आठवण व अडचण होते.हे कितपत योग्य आहे?मानपान हे दुसरे काहीनसून गाव रहाट चालावी,शिस्त बिघडू नये,गावातील उत्सव,जत्रा,विना अडथळे पार पाडाव्यात म्हणून मागील पिढीने काहीना अधिकार-मान देऊन कार्य सुलभपणे पार पाडण्याची जबाबदारी सोपवली,हे आपण प्रथम लक्षात घेतले पाहिजे.मान म्हणजे अधिकारा बरोबर जबाबदारी असते,ती पार पाडण्याची क्षमता ज्याचे मध्ये असते त्यांनाच अधिकार दिले जातात,हा सोपा नियम आहे.म्हणजे जबाबदाऱ्या योग्य पणे पार पाडतअसेल तर त्या मानकरी व्यक्ती बद्दल इतरांना मग ती व्यक्ती कोणत्याही जाती/जमातीची असली तरी तक्रार असण्याची काहीच गरज नाही.पण ती व्यक्ती जर दिलेल्या मानाचा व अधिकारांचा अतिरेकी वापर करून अन्यायाने वागत असेल तर त्याला जरब हि गावाचीच असावी.आजच्या प्रगत जगात पैसा आला कि प्रतिष्ठा लाभतेच,सामाजिक आणि धार्मिक प्रतिष्ठे साठी कोणी त्याचा वापर करून वाद निर्माण करत असेल तर ते समाजास घातक ठरणार आहे.समजा जर असा प्रयत्न कोणी केला तर गावातीलच वडिलधाऱ्या व प्रतीस्ठीतानीच निरपेक्ष व निर्भीड पणे न्यायनिवाडा करवा, हा एकच पण खात्रीचा मार्ग आहे हे निश्चित .
श्री.दिलीप सी. जाधव.
कुणबी/मराठा अशी वादावादी जुंपते,कधी अग्र पूजेच्या मानावरून,कधी विडा कोणी ठेवावा? कोणत्याही शुल्लक कारणाने वाद चालू होतात.हे वाद न मिटल्याने कधी कोर्टात नेले जातात.काही वर्षानपूर्वी देवीची पालखी किती दिवस भोवती साठी असावी या वरुन कुणबी व मराठे यांत वाद झाला,केस कोर्टात गेली गावातील वातावरण २ वर्षे तंग,शिमगा साजरा झाला नाही.शेवटी कोर्टात निर्णय झाला.पालखी समसमान दिवस दोन्ही समाजाकडे असावी.मधल्या काळात मारामारी,हुल्लडबाजी सर्व गावाचे वातावरण बिघडले. कमी अधिक प्रमाणात हे सर्व कडे पहावयास मिळत आहेआज पर्यत जो बंधुभाव,शांतता जे मागील पिढीने जपले ते सारे संपून लहान सहान गोष्टीवरुन तंटे होऊन पोलीस केस,संचार बंदी लागू होणे अशा मुळे उत्सवावर पाणी पडते.गावात विधायक कामे करणारी मंडळे व सज्जन गावकरी यांचा वेळ व पैसा या वादाने वाया जातो. म्हणजे जे काही थोडे धार्मिक,सामाजिक कार्य कोकणात या मंडळामार्फत होते आहे ते हि बंद पडेल. सामाजिक असंतुलन होऊन समाजकंटक याचा फायदा उठवतील.हे आता थाबविले पाहिजे,कारण उत्सव ४ ते ५ दिवस असतात पण या वादाचे परिणाम वर्षभर भोगावे लागतात,जर कोर्टात केस गेली तर पुढील कित्तेक वर्षे.
या वादांना आळा घालण्यासाठी गावातीलच संबंधित लोकांनी आपल्या सद्सद्विवेक बुद्धीने निरपेक्ष व निर्भीड निर्णय देणे आवशयक आहे.गावातील समाज व्यवस्था,नियम,रूढी,परंपरा परिस्थिती याचे आकलन हे त्यांना असल्याने त्यांचे निर्णय जास्त योग्य असतील.मात्र ते निर्भीडपणे,काळानुरूप,तार्किक (लोजिकल) असणे आवश्यक आहे.असे झाले तर ९० टक्के वाद गावातच मिटतील.आडमुठेपणा झाला तर कोर्ट कचेऱ्या ठरलेल्याच आहेत.पण कोर्टाचा निर्णय योग्य असेलच याचा काहीं नेम नाही,कारण कोर्ट जशी बाजू मांडली जाते त्याचा सारासार विचार करून निर्णय देते.कायधाची चौकट कोर्टाला असतेच .मानसिक पातळीवर रूढी,परंपरा,गाव रहाट याची माहिती कोर्टाला असेलच याची खात्री नाही,असली तरी त्या पातळीवर अभ्यासक पणे निवडा देईल असे नाही.बहुधा जर्ज परप्रांतीय असतात त्यांना या सर्वाची माहिती नसेल तर न्यायात हि अन्याय होऊ शकतो.मग अशा वादात कोर्टात जाऊन उपयोग होत नाही.
म्हणजे असे वाद गावपातळीवर सोडविणे योग्य आहे हे आपल्याला पटेल.कमी वेळात वाद मिटतील
व मने कलुषित होणार नाहीत.रूढी परंपरा आपणच निर्माण केलेल्या असतात,मानपान हे आपणच दिलेले असतात व मान्य केलेलेअसतात.कालानुरूप त्यात बदल होणे अनिवार्य आहे हे हि आपण लक्षात ठेवले पाहिजे.कोणी शिकला पैसेवाला झाला कि त्याला मानाची आठवण व अडचण होते.हे कितपत योग्य आहे?मानपान हे दुसरे काहीनसून गाव रहाट चालावी,शिस्त बिघडू नये,गावातील उत्सव,जत्रा,विना अडथळे पार पाडाव्यात म्हणून मागील पिढीने काहीना अधिकार-मान देऊन कार्य सुलभपणे पार पाडण्याची जबाबदारी सोपवली,हे आपण प्रथम लक्षात घेतले पाहिजे.मान म्हणजे अधिकारा बरोबर जबाबदारी असते,ती पार पाडण्याची क्षमता ज्याचे मध्ये असते त्यांनाच अधिकार दिले जातात,हा सोपा नियम आहे.म्हणजे जबाबदाऱ्या योग्य पणे पार पाडतअसेल तर त्या मानकरी व्यक्ती बद्दल इतरांना मग ती व्यक्ती कोणत्याही जाती/जमातीची असली तरी तक्रार असण्याची काहीच गरज नाही.पण ती व्यक्ती जर दिलेल्या मानाचा व अधिकारांचा अतिरेकी वापर करून अन्यायाने वागत असेल तर त्याला जरब हि गावाचीच असावी.आजच्या प्रगत जगात पैसा आला कि प्रतिष्ठा लाभतेच,सामाजिक आणि धार्मिक प्रतिष्ठे साठी कोणी त्याचा वापर करून वाद निर्माण करत असेल तर ते समाजास घातक ठरणार आहे.समजा जर असा प्रयत्न कोणी केला तर गावातीलच वडिलधाऱ्या व प्रतीस्ठीतानीच निरपेक्ष व निर्भीड पणे न्यायनिवाडा करवा, हा एकच पण खात्रीचा मार्ग आहे हे निश्चित .
श्री.दिलीप सी. जाधव.
No comments:
Post a Comment