Wednesday, July 20, 2011

कोसुंब गावाचे जपता वाटप


शके १६९९ हेमलंबी नाम संवत्सरे माघ शुद्ध त्रीओदशी या दिवशी सर्व कोसुंब गावाचे जपता वाटप  
   करण्यात आले.यशवंतराव घराणी फाटल्या मुळे रा.रा.श्री.गोविंदजी बाबुराव यशवंतराव  
रा.रा.श्री.आत्माजी राजोजी यशवंतराव ,रा.रा.श्री.जिवाजी सूर्याजी यशवंतराव
   आणि रात्नोजी कृष्णा यशवंतराव यांचे मध्दे झाले.गाव निम्मा निम्मा वाटण्यात आला.
   त्या वेळी राजापूर सुभ्याचे देश कुलकर्णी श्री.रामजी यशवंत मुल्ये.खोत असुर्डे यांना पेशवे दरबारातून
   नेमण्यात आले.त्या वेळी  गावातील सर्व जमिनी,झाडे,नाले,पाट पाणी,यांचे रीतसर वाटप
   करण्यात आले.तसेच होळीची जागा,देवळात बसण्याची जागा,पालखी ठेवण्याची जागा,सर्व
    निश्चित करण्यात आले.गावातील बलुतेदार जसे कुणबी,न्हावी,लोहार,सुतार,महार,यांचे हि
    नावासह वाटप करण्यात आले.
    या जपता वाटपाचा करारनाम्यासाठी कोसुंब गावाचा सीमा ज्या गावांना भिडतात त्या गावातील
    प्रतिष्ठीत खोताना साक्षीदार म्हणून पाचारण करण्यात आले होते.त्यात करमबेलेचे महाडिक खोत
  आंबावचे  आदतराव खोत(,माने),कदम खोत, सांगवे चे शेलार खोत,विघ्रवलीचे इंदुलकर खोत,काटवलीचे  
   घाग खोत,साडवलीचे जाधवराव, इतर काही मंडळीच्या सह्या आणि निशाण्या आहेत.त्याच प्रमाणे देश
  कुलकर्णी,देसाई यांचे मुतालिक शिक्का मोर्तब आहे.हा अतिशय महत्वाचा कागद पुरातत्व खात्याकडे आहे.
    हे वाटप साधारण सन १७७७ मध्दे फेब्रुवारी महिन्यात झाले असावे.त्या वेळी सवाई माधवराव पेशवा गादीवरहोता.तसेच दुसरे राजाराम महाराज (सन १७४९-१७७७) दुसरे शाहू महाराज (सन १७७७-१८१०)गादीवर होते. म्हणजे सर्व  राज्जात गोंधळाची परिस्थिती असावी.त्याचा फायदा उठविण्यात आला .


No comments:

Post a Comment