कोकणातील ग्रामदेवातांचा इतिहास आणि उपासना.
ग्रामदेवातांचा इतिहास फार रंजक आणि उद्बोधक आहे. संशोधकांचा मते ग्रामदेवता या स्वयंभू स्वरुपात अस्तित्वात आल्या,त्यांची उत्पत्ती हि लोकवस्ती पासून दूर अश्या जंगलात झाली.आपल्या कडे ग्रामदेवतांचे स्थान आज हि जंगलात आढळते .
प्रथम या देवतांची पूजा आर्च त्या प्रदेशातील मूळ रहिवाशी करीत असत.देवताना रंग,आकार,रूप, असे काही निश्चित नव्हते.काही ठिकाणी साधा दगड वा झाडाची डोली,झाडांचा बुन्धात असलेल्या खोबणीत,तर काही ठिकाणी नुसताच दगडांचा गडगा,असे काही रूप असे.या देवतांची पूजा पुष्प,वाद्ध,बळी अशा प्रचलित पद्धतीने चालत असत.दुष्ट व सुष्ट दोन्ही शक्ती तांचे ठायी एकवटल्या ने त्यांचा पूजे मागे भय ,भीती असी भावना असे.या देवता बहुत करून देवी असत.या देवतां बद्दल मानवाच्या मनात कायम गूढ भीती असे,कालांतराने हि देवते उच्च वर्नियांस पण आकर्षक वाटू लागल्याने त्यांची उपासना ते करू लागले.मात्र प्राचीन संस्कृती बदलल्यामुळे (आर्यांचे आगमन) उपासनेत बदल घडून वैदिक ,शैव अशा उच्च वर्नियाचा पूजाविधी नुसार पूजा होऊ लागली.देवताना प्रतिष्ठा मिळून आर्यांचा सांस्कृतिक प्रगतीचा प्रभाव पडून देवताना विशिष्ठ आकार म्हणझे मूर्त रूप मिळून पाषाण मूर्तींमध्ये रूपांतर झाले.
प्रथम या देवतांची पूजा आर्च त्या प्रदेशातील मूळ रहिवाशी करीत असत.देवताना रंग,आकार,रूप, असे काही निश्चित नव्हते.काही ठिकाणी साधा दगड वा झाडाची डोली,झाडांचा बुन्धात असलेल्या खोबणीत,तर काही ठिकाणी नुसताच दगडांचा गडगा,असे काही रूप असे.या देवतांची पूजा पुष्प,वाद्ध,बळी अशा प्रचलित पद्धतीने चालत असत.दुष्ट व सुष्ट दोन्ही शक्ती तांचे ठायी एकवटल्या ने त्यांचा पूजे मागे भय ,भीती असी भावना असे.या देवता बहुत करून देवी असत.या देवतां बद्दल मानवाच्या मनात कायम गूढ भीती असे,कालांतराने हि देवते उच्च वर्नियांस पण आकर्षक वाटू लागल्याने त्यांची उपासना ते करू लागले.मात्र प्राचीन संस्कृती बदलल्यामुळे (आर्यांचे आगमन) उपासनेत बदल घडून वैदिक ,शैव अशा उच्च वर्नियाचा पूजाविधी नुसार पूजा होऊ लागली.देवताना प्रतिष्ठा मिळून आर्यांचा सांस्कृतिक प्रगतीचा प्रभाव पडून देवताना विशिष्ठ आकार म्हणझे मूर्त रूप मिळून पाषाण मूर्तींमध्ये रूपांतर झाले.
मग प्रचलित संस्कृती प्रमाणे देवालयात त्यांची प्राण प्रतिष्ठा होऊन यथा साग पूजा होऊ लागली.शत्रीयांनी आपल्या शक्तीचा जोरावर ,ब्राह्मणांनी आपल्या बुद्धीचा करामतीने या देवालया मध्ये आपले वर्चस्व स्थापन केले,पण मूळ उपासक जे खालच्या थरातील होते,ते हळूहळू या देवतां पासून दूर जाऊ लागले.याचे उत्तम उधाहरण म्हणजे मूळ महार वंशातील लोकांनी श्री.बाबासाहेब आबेड्कारांचे शिकवणुकीने बौद्ध धर्माचा स्वीकार करून त्यांच्या देवतांचे पूजन करावयाचे सोडले.कारणे अनेक असली तरी ,हा परिणाम उच्च वार्नियाच्या एकाधिकार शाहीचाच होता.तरी काही ठिकाणी अजूनही या देवतांचे पूजे बाबत या खालचा थरातील लोकांची मक्तेदारी राहिली ती आज तागायत .काही ग्राम देवता पुरुष देव हि असत ,पण त्याची वर्णी फारतर स्त्री देवतांचे शिपाई ,अंगरक्षक किंव्हा युद्धविर इतपत मर्यादित होती.
सहीयाद्रीचा दऱ्या खोऱ्यात फिरताना,गड किल्ल्याच्या पायथाशी असणाऱ्या गावातून अनेक रंजक गोष्टी कानावर पडत व पाहायला मिळत.तेथील मूळ लोकांच्या चालीरीती,रूढी,परंपरा,पूजा,उपासना पद्धती,देवता,या विषयीच्या गूढ गोष्टीची चर्चा चाले.काही अद्भुत अनु भव हि आले.लोणावळ्या पासून १५ कि.मी.वर "राजमाची"नावाचा जोड किल्ला आहे.या किल्ल्याच्या वाटेवर आमच्या सोबत गावकरी वाटाडे असत,ते येका विशिष्ट ठिकाणी झाडाची पाने,डहाळ्या वाहत असत.विचारले असता समझले कि,ते झाड्देवाचे स्थान आहे.वाटेत काही विघ्न येऊ नये म्हणून ते असे करीत.पुढे वरचेवर या गडावर कामासाठी जाने होऊ लागले.आम्हीही तिथे डहाळ्या वाहू लागलो.त्या देवाचा स्वीकार आम्हीही केला.तोआम्हासही पूजनीय वाटू लागला.साधारण याच नियमा प्रमाणे आधीच्या ग्राम देवता पूजनीय झाल्या. किंबहुना पुष्प ,वाद्ध(वाजवणे),बळी या प्राचीन उपसणेसह त्याचा स्वीकार झाला.पण उच्च वर्नियानी आपले वर्चस्व आजही कायम ठेवले आहे.
काही ग्राम देवता पृथ्वी तत्वाच्या होत्या,म्हणजे श्री भवानी,श्री अंबाबाई,श्री रेणुकामाता,यांना तर कुलदेवतांचा मन मिळाला. त्या तर घराघरातून ,देव्हाऱ्यात बसावून पूजल्या जाऊ लागल्या.त्यांना आदी शक्ती,आदी माया संबोधण्यात येऊ लागले.शक्ती पीठाचे महत्व प्राप्त झाले.त्यांची मूळ रूपे ग्राम देवतांची होती,तरी त्या इतक्या लोकप्रिय झाल्या कि त्यांनी देव्हाऱ्यातच स्थान मिळविले.
निसर्गाच्या सानिद्धात मानव प्राणी राहत असता,त्याला भोगाव्या लागणाऱ्या यातना,ओढवणाऱ्या आपत्तीचे भय,जीवनाची अनिश्चितता,जनावरे ,पंच महाभूतांचे भय या सर्वा पासून रक्षण करण्यासाठीत्याला कायम एखाध्या भक्कम मानसिक आधाराची गरज होती.सर्व आपत्ती,जन्म-मृत्यू या मधील संघर्ष यात रक्षण करण्यासाठी धेर्य दिले ते या सर्व शक्तिमान देवतानीच ,त्याला खरोखरच आधार दिला व त्याचे जीवन सुसह्य केले हे मात्र निश्चित.
दिलीप सीताराम जाधव.
(आधार : श्री डॉ.भालचंद्र आकलेकर"कोकणचा सांस्कृतिक इतिहास"इतिहास संशोधक मंडळ या ग्रंथावरून स्वैर विवेचन.)
सहीयाद्रीचा दऱ्या खोऱ्यात फिरताना,गड किल्ल्याच्या पायथाशी असणाऱ्या गावातून अनेक रंजक गोष्टी कानावर पडत व पाहायला मिळत.तेथील मूळ लोकांच्या चालीरीती,रूढी,परंपरा,पूजा,उपासना पद्धती,देवता,या विषयीच्या गूढ गोष्टीची चर्चा चाले.काही अद्भुत अनु भव हि आले.लोणावळ्या पासून १५ कि.मी.वर "राजमाची"नावाचा जोड किल्ला आहे.या किल्ल्याच्या वाटेवर आमच्या सोबत गावकरी वाटाडे असत,ते येका विशिष्ट ठिकाणी झाडाची पाने,डहाळ्या वाहत असत.विचारले असता समझले कि,ते झाड्देवाचे स्थान आहे.वाटेत काही विघ्न येऊ नये म्हणून ते असे करीत.पुढे वरचेवर या गडावर कामासाठी जाने होऊ लागले.आम्हीही तिथे डहाळ्या वाहू लागलो.त्या देवाचा स्वीकार आम्हीही केला.तोआम्हासही पूजनीय वाटू लागला.साधारण याच नियमा प्रमाणे आधीच्या ग्राम देवता पूजनीय झाल्या. किंबहुना पुष्प ,वाद्ध(वाजवणे),बळी या प्राचीन उपसणेसह त्याचा स्वीकार झाला.पण उच्च वर्नियानी आपले वर्चस्व आजही कायम ठेवले आहे.
काही ग्राम देवता पृथ्वी तत्वाच्या होत्या,म्हणजे श्री भवानी,श्री अंबाबाई,श्री रेणुकामाता,यांना तर कुलदेवतांचा मन मिळाला. त्या तर घराघरातून ,देव्हाऱ्यात बसावून पूजल्या जाऊ लागल्या.त्यांना आदी शक्ती,आदी माया संबोधण्यात येऊ लागले.शक्ती पीठाचे महत्व प्राप्त झाले.त्यांची मूळ रूपे ग्राम देवतांची होती,तरी त्या इतक्या लोकप्रिय झाल्या कि त्यांनी देव्हाऱ्यातच स्थान मिळविले.
निसर्गाच्या सानिद्धात मानव प्राणी राहत असता,त्याला भोगाव्या लागणाऱ्या यातना,ओढवणाऱ्या आपत्तीचे भय,जीवनाची अनिश्चितता,जनावरे ,पंच महाभूतांचे भय या सर्वा पासून रक्षण करण्यासाठीत्याला कायम एखाध्या भक्कम मानसिक आधाराची गरज होती.सर्व आपत्ती,जन्म-मृत्यू या मधील संघर्ष यात रक्षण करण्यासाठी धेर्य दिले ते या सर्व शक्तिमान देवतानीच ,त्याला खरोखरच आधार दिला व त्याचे जीवन सुसह्य केले हे मात्र निश्चित.
दिलीप सीताराम जाधव.
(आधार : श्री डॉ.भालचंद्र आकलेकर"कोकणचा सांस्कृतिक इतिहास"इतिहास संशोधक मंडळ या ग्रंथावरून स्वैर विवेचन.)
No comments:
Post a Comment