Friday, July 22, 2011

विवेचन


समाजात प्रामाणिकपणे काम करत असताना प्रत्येकाने विज्ञाननिष्ठ,विवेकी,आणि तर्कशुध्द
विचारसरणीचा
अंगीकार करून निर्भीडपणे निर्णय घावेत आशी अपेक्षा असते.श्री जुगाई सेवा
संघाचे
  उदधीष्ट आणि कार्यकक्षा याचे विवेचन आता अनिवार्य झाले आहे.म्हणजे संघाचे गावाचे
धार्मिक
,सामाजिक निर्णयात सहभाग अधिकार कोणते आहेत?एखाद्या धार्मिक निर्णयात सहभाग,
मर्यादा
कोणत्या?

श्री जुगाई सेवा संघाचे कार्यक्षेत्र जास्तकरून गावी असल्याने आपण २००० साली ग्रामस्थाच्या कार्यकारिणीची
नियुक्ती केली,त्या कार्यकारिणीला अधिकार कोणते,कार्यकक्षा,निर्णयातील मर्यादा या विषयी माहिती
असणे
आवश्यक आहे.धार्मिक रूढी,परंपरा त्या जोपासण्यात आधुनिक युगात येणाऱ्या अडचणी.या
विषयीच्या
चर्चासत्रामध्ये गावातील वडिलधाऱ्या,विचारवंत,अभ्यासक सभासदांची मदत अत्यंत मोलाची आहे.
.धार्मिक रूढी,परंपरा या मानव निर्मित असून कालानुरूप,प्रसंगानुरूप त्यामध्ये बदल अपरिहार्य आहेतकिंबहुना
ते आवश्यकच आहेत.सुतका विषयीचा निर्णय आपण सर्वानुमते घेतला.आपल्या गावातील जेष्ठ सभासद,मानकरी यांचे उपस्थितीत समंत करून घेतला.पण तो लिखित स्वरूपात असावा असे ठरले आहे म्हणजे दर वेळी होणारे गोंधळ व निर्णयात सतत होणारे बदल थाबतील.    
काही
मुलभूत चालीरीती,रूढी,परंपरा,गाव रहाटी यांचे ज्ञान नवीन पिढीला असणे  आवश्यक आहे.या मागचे प्रामाणिक कारण म्हणजे आजच्या तरुणांना पुढे येणाऱ्या पिढीला या सर्वाची अधिकृत माहिती असणे हि काळाची गरज आहे.म्हणजे कोणीही या विषयी काही चुकीची,अर्धसत्य त्रोटक माहिती दिल्याने होणारे गैरसमज दिशाभूल होणार नाही.तसेच माहितीमधील तफावतीमुळे होणारे गोंधळ वाढणार नाहीत.लिखित स्वरूपात नियमावली असल्याने निर्णय व्यक्तीमुळे,वाडीमुळे,वा कार्यकारणीचा दाबावामुळे  वेळोवेळी बदललणार नाहीत.त्यामुळे कार्यक्रम वादविवाद होता,आनंदात,उत्साहात पार पडतील.

(टीप : वरील लिखाण हे माझे स्व:तचे मत असल्याने ते चुकीचे, अतिशायोक्तीचे  वाटणे अपरिहार्य आहे)

No comments:

Post a Comment