श्री जुगाई,श्री सुकाई,श्री पडलकारीन,श्री वरदान,श्री माउली ची पालखी
देवीची पालखी
मानकरी व गुरव होमाची पूजा करताना
दीपक मानकरी व उदय मानकरी होमास अग्नी देताना
पालखी खाद्यावर घेऊन नाचताना बारभाई
आशीर्वाद घेताना श्री व सौ दिलीप सी. जाधव.
खणा नारळाने भरलेल्या देवींच्या ओट्या
पालखी हातावर खेळवताना
पालखी होमाभोवती मानकरी व बारभाई प्रदक्षिणा घालताना
प्रदक्षिणा
होम लागल्यावर पालखी खेलविताना
फाक पंचमी पासून गावात होलीकोत्सव साजरा करायला सुरवात होते.कातळखळाच्या माळावर सर्व गावकरी जमतात आणि कोकड होळी पेटवतात.विविद म्हणजे हुतुतू,आटापाट्ट्या सारखे मर्दानी खेळ खेळतात.
दिंड्याची खोडे तापउन ती कातळावर आपटून फटाक्या सारखा आवाज येतो,पूर्वी फटाके म्हणून याचा वापर होत असे.फाल्गुन शुद्ध त्रयोदशीला (तेरशी) माड म्हणजे आंबा किंव्हा माडाचा उभे खोड तोडून ते हातावर झेलत नाचवत सहाणेवर आणले जाते.यासाठी खूप दमछाक होते,अडचणीच्या ठिकाणी जर ते असेल तर फार कष्ट होतात.पण सर्व जण उत्साहाने माड खेळवतात,सहाणेवर माड पाना-फुलांनी सजविला जातो,एका विशीष्ठ ठिकाणी छोटा खड्डा करून त्यात माड उभा केला जातो.माड उभा करण्यासाठी जाड वासे कैच्या करून टेकू लावतात.हि एक अजब कला आहे,त्या साठी ताकत आणि डोके वापरावे लागते.
दुसऱ्या दिवशी फाल्गुन शुध्द चतुर्दशीला सायंकाळी सर्व बारभाई श्री जुगाईच्या मंदिरात जमतात.देवींची चांदीची रूपे सोन्याच्या दागिन्यांनी सजविली जातात,ती पालखीत बसउन पालखी आकर्षकपणे सजविली जाते.पालखी रूपे बसविणे,ती सजवणे हि पण एक अवघड कला आहे,कारण पालखी नाचविताना रूपांना व सोम्बाचा पिंडीला कोठलाही धक्का लागणार नाही अशी काळजी घावी लागते.हि रूपे म्हणजे देविंचीच प्रतीरूपे असतात.या मागची संकल्पना अशी असावी कि,गावच्या रक्षणासाठी या ग्रामदेवता आपल्या सर्व देवता परिवारा समवेत प्रदक्षिणे साठी देवळा बाहेर पडतात.आपण काळजीपूर्वक याचा विचार केला तर पालखी गावतील सर्व ठिकाणी जाते व आपल्यातील शक्तीने ग्रामदेवता सर्व वाईट शक्तींना गावच्या सीमेबाहेर अटकाव करतात.याला रूढ अर्थाने सीमा बांधणे असे म्हणतात.लौव्किक पणे हे खरे असावे,तशीच धारणा सर्व कोकण प्रदेशात आहे.सनई,ढोल,तासे यांच्या तालावर पालखी नाचवत नाचवत सहाणेवर आणली जाते.
कोसुंब गावची बारभाई विभागाची सहान(सहानेची वाडी )
फाल्गुन शुद्ध पौर्णिमा या दिवशी सायंकाळी सहाण भरते,म्हणजे सर्व बारभाई सहाणेवर जमतात.देवींची पालखी नाचवतात.रात्री मनाचे नमन (खेळे) होते,सर्वजण खेळे आवडीने पाहतात.हि लोककला जी थोडी फार जगली आहे ती या शिमगोत्स्वामुळे,(याच्या विषयी सविस्तर पोस्ट लिहीन).सर्व एकत्रित पणे खेळ्याची मजा लुटतात.
फाल्गुन वद्य प्रतीपदा या दिवशी सकाळी सर्व बारभाई सहाणेवर नटून सजून जमतात.आजचा दिवस मोठ्या आनंदाचा,पारंपारिक वेषात सजलेल्या माता,भगिनी,माहेरवासिनी,सासुरवासिनी,अबाल वृद्ध सारे वेगळ्याच उत्साहात एकमेकांना भेटतात,होळीच्या शुभेच्छा देतात.सहानेच्या मळीत गवताची होळी उभारण्यात येते,इतर ठिकाणी आपण लाकडाची होळी पाहतो,पण हि होळी गवताच्या गंजी रचून करतात.पाच मानकरी म्हणजे मोठ्या घराण्याचे प्रमुख व सर्व बारभाई समाज्याचे प्रमुख मानकरी,मधल्या घराण्याचे मानकरी,धाकट्या घराण्याचे मानकरी,सुतार मानकरी आणि कुणबी मानकरी होळीची पूजा करतात.पालखी नाचवत खेळवत होळी भोवती प्रदक्षिणा घालतात,नवीन लग्न झालेली जोडपी होळीला नारळ अर्पण करण्या साठी आवर्जून गावी येतात व आपले पुढील आयुष सुखी समाधानी व्हावे या साठी देवीला साकडे घालतात,तसेच गावातील वडिल धाऱ्यांचे आशीर्वाद घेतात.हे संस्कारित मूल्य आपण अजून जपले आहे. सर्व मानकरी माना प्रमाणे होमला अग्नी देतात.नारळ अर्पण करतात.सर्वजण होळीची पूजा करतात.पालखी पुन्ह्या मनसोक्त नाचविली जाते.यावेळी ओरडून देवीची महती गातात त्याला 'फाक' म्हणतात.नाचून झाल्यावर पालखी परत सहाणेवर आणतात.सर्व बारभाई,त्यांचे नातेवाईक पूजा करतात,नैवध्य,प्रसाद दाखवतात.माहेरवासिनी श्री पडलकरीन देवीची खाणा नारळाने ओटी भरतात.सासुरवासिनी श्री जुगाई व इतर देवतांच्या ओट्या भरून आशीर्वाद मागतात.सर्व पूज्या झाल्यावर आपले मोठे मानकरी देवीना जाप करतात आणि सर्वासाठी आशीर्वाद मागतात.सर्व नवस फेडले जातात.नवीन नवस बोलले जातात.रात्री नमनाचा(खेळे) कार्यक्रम मुंबईकरग्रामस्था तर्फे आयोजण्यात येतो. फाल्गुन वध्य द्वितिया या दिवशी देवींचे विडे भरण्याचा विधी जंगम पुजाऱ्या मार्फत केला जातो.सर्व पाच मानकरी व बारभाई समवेत विडे भरल्यावर पालखी सहानेवरून शिपन्यासाठी प्रथम मोठ्या मानकरी श्री.दयारामदादा . यांचे कडे जाते.आपल्या देवींचे सर्व अधिकार या घरी आहेत.पालखी तेथून मधल्या मानकरी श्री.दीपक मनोहर (मळे वाडी) यांचे कडे जाते.तेथून पालखी धाकटे मानकरी श्री.सुभाष शंकर यांचे कडे पूजे साठी येते.मग पालखी सुतार मानकरी कडे जाते.त्या नंतर पालखी इतर बारभाई विभागातील फौजदार वाडी,मावळतची वाडी,सहानेची वाडी,श्री विठाबाई स्थान पूजा,कातळवाडी,पातालेवाडी,श्री तलेकरीन पूजा,सोंड वाडी,फुगीची वाडी,श्री पडलकरीन पूजा,तेथून श्री सुखाई पूजा,सर्व घरे व देवस्थानात पूजा झाल्यावर राखण दिली जाते व पालखीतील रूपे काढली जातात.दर तीन वर्षांनी देवींची मूळ स्थानके समजावली जातात,म्हणजे पालखी सवाद्ध मानकरी समवेत स्थानका कडे पालखी नेऊन पूजा केली जाते,परत देवळात पालखी आणून मूळ स्थानक व देवळातील देवी भेटविल्या जातात.(हेतू विषयी वेगळे विवेचन पुढील पोस्ट मध्ये).या प्रकारे आपल्या गावचा शिमगोत्सव साजरा केला जातो.
पालखी बारभाई विभागातील प्रत्येक घरात पूजे साठी नेली जाते.या मागील धारणा अशी आहे कि,देवी आपल्या घरात येऊन पुढील एका वर्षा साठी आपले रक्षण करते,आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करते.गुरव त्या प्रमाणे जाप करतात.सर्व घरातील सुहासिनी ओटी भरतात.
(मला असलेल्या माहिती प्रमाणे वरील लिखाण केले आहे,यात त्रुटी असू शकतात.जर कोणास अधिक माहिती असल्यास माझाशी संपर्क साधावा.)
Namskaar Dilip sir. Mala Jugai devi baddal ajun mahiti havi hoti. Tar , aapala E-mail ID mala aapan deta ka pls.
ReplyDeleteनमस्कार होय ,दिलिपजी नी दिलेली माहिती पूरक आहे.माझ्या माहिती प्रमाणे . माझे नाव -अनिल धाकटू डावल माझा.मो.न. 8097534367 email ID dawalanil98@gmail.com
ReplyDelete