Friday, November 4, 2011

आमचे पप्पा आणि आई 
निरागस हास्य माणसाच्या स्वभावाचे प्रतिबिंब ............



  शिक्षण आणि आर्थिक परिस्थिती सुधारल्या  शिवाय कोणत्याही समाजाचा उत्कर्ष होत नाही,म्हणून प्रथम  शिक्षण देऊन मग रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्यास दोन पिढ्यात समाज उन्नत होतो.
श्री.(कै) सीताराम भाऊराव जाधव.








Saturday, October 29, 2011

हृदयस्थ अजीतभाई जाधव

                                                                   हृदयस्थ अजीतभाई जाधव      

अजित जाधव यांच्या उत्तुंग कर्तुत्वाचे पैलू व वैचारिक पातळीचे दर्शन आपणा सर्वांस व्हावे,तसेच या कोसुंब गावच्या भूमिपुत्रास अभिवादन करण्याची हि विनम्र धडपड.
                       "आदित्याची झाडे / सदा सन्मुख सूर्याकडे//"                                                                           या संत श्रेष्ठ  ध्यनेश्वरांच्या वचना प्रमाणे अजीतभाईनी  आपल्या नियोजित कार्यात स्व:ताला झोकून दिले,अजितचा जन्म कोसुंब गावी एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला.अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपले प्राथमिक व माध्यमिक  शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल ,बुरंबी (दादासाहेब सरफरे विधालय) येथे पूर्ण  केले.शिक्षण घेत असतानाच त्यांची नाळ शाळेशी,समाजाशी व कोकणच्या मातीशी जोडली गेली.पुढील शिक्षण घेण्यासाठी ते मुंबईस आले.कष्टाने आणि सचोटीने व्यवसायात यश संपादन केले.पण त्यांचे मन मात्र शाळेतच गुंतले होते.ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांसाठी काहीतरी करावे हा विचार त्यांना स्वस्थ बसू देईना.
                     मुंबईत अपना बझार परिवारातील श्री.अशोकभाई व सुभाषभाई या सरफरे बंधूनी आपल्या चाणाक्ष नजरेने हि त्यांची तळमळ पहिली व त्यांचेवर बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या जनरल सेक्रेटरी पदाची जबाबदारी टाकली.ग्रामीण भागातील मुलांना शहरी मुलांप्रमाणे दर्जेदार शिक्षण मिळावे या दृष्टीकोनातून अद्यावत शाळेच्या इमारतीच्या बांधकामाचे शिवधनुष्य उचलले आणि सर्व अडचणींवर मात करत सर्व सहकार्यांना बरोबर घेत अवघ्या २ वर्षात शाळेची इमारत उभी केली.आज या संकुलात सर्व सुविधा मुलांना उपलब्ध असल्याने येथील विधार्थी ९०% पेक्षा जास्त गुण मिलउन तालुक्यात शालान्त परीक्षेत प्रथम येत आहेत.हीच खरी त्यांच्या कार्याची प्रचीती आहे.
                 सतत येणाऱ्या अडचणी व सततच्या दगदगीचा परिणाम त्याचे शरीरावर झाला.पण हाती घेतलेले कार्य तडीस नेण्याच्या ध्यासाने त्यांनी आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केले,मोठ्या आजाराने ते ग्रस्त झाले.इस्पितळात दाखल करावे लागले.अखेर ९ सप्टेंबर २००९ रोजी ते अनंतात विलीन झाले.आज हा कोसुंबचा सुपुत्र शरीराने आपल्यात नसला तरी त्याचा कार्याने शाळेच्या रुपात सतत आपल्यात वावरतो आहे.शाळेतून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक विध्यार्थाचे रूपाने तो  सर्वाना दिसणार आहेत. श्री जुगाई सेवा संघाचा हा कार्यकर्ता त्याच्या कार्यामुळे अमर झाला आहे.संघा तर्फे त्यांचे  नावे शालान्त परीक्षेत पंचक्रोषित  प्रथम येणाऱ्या विधार्थ्यास  पारितोषक देण्यात येते,२०१० व २०११ या दोन्ही वर्षी हा मान दादासाहेब सरफरे शाळेतील विधार्थ्याना  मिळाला,हीच खरी त्यांना मूक श्रद्धांजली व त्यांचे जीवन फलित आहे.

दिलीप जाधव.
(श्री विष्णू  मारुती कांबळे यांचे लेखावरून)




Friday, October 28, 2011

अद्वैत दिलीप जाधव "मुजसे फ्रेन्डशिप करोगे" या चित्रपटात छू ले  या गाण्यात बेस गिटार वाजविताना.
यश चोप्राची नवीन फिल्म २०११ .





Thursday, October 6, 2011

श्री जुगाई सेवा संघ मुंबई. ८९ वे दसरा स्नेह संमेलन.

                                                          // श्री जुगाई सेवा संघ मुंबई.//                                ६/१०/२०११
८९ वे दसरा स्नेह संमेलन "नायगाव -वडाला भाडेकरू संघ" सभागृह येथे ६/१०/२०११ या दिवशी   सायंकाळी ठीक ५ वा. मोठ्या उत्साहात पार पडले.या वेळी कोसुंब गावातील यशस्वी विधार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच विशेष प्रविंन्य मिळविणारे श्री.उदय अनंत डावल यांनी प्रतिकूल परिस्थितीत जे.जे. आर्ट्स मधून फाईन आर्ट्स मध्ये पदवी प्राप्त केली.या वर्षी स्प्रिंग मिल येथे गणेश उत्सवात कैलास पर्वताचा देखावा उभारून आपल्यातील गुण सिद्ध केले.यावेळी उपस्थित सभासदांनी  मार्गदर्शन केले.श्री जुगाई मंदिराच्या नवनिर्मती विषयी चर्चा झाली.श्री जुगाई सेवा संघ  पब्लिक ट्रस्ट नोंदणी करावा असे ठरविण्यात आले.कार्यक्रमात समर्पण निधी साठी हंडी वाटण्यात आल्या. यावेळी कोसुंब गावातील गावात राहानाऱ्या शालान्त परीक्षेत सर्व प्रथम येणाऱ्या विधार्थ्यास (कै)बाबाजी दाजी जाधव स्मृती पारितोषिक श्री.रवींद्र बाबाजी जाधव यांनी सचिव श्री.दिलीप जाधव यांच्या सूचनेवरून जाहीर केले,आपण गावात राहणाऱ्या विधार्थ्यास प्रथमच असे पारितोषिक देणार आहोत.      या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे .........................
श्री जुगाई सेवा संघ मुंबई,दसरा स्नेह संमेलन
सभागृहात जमलेले सभासद 
संघाचे कार्याध्क्ष श्री.जनार्धन मु.जाधव मार्गदर्शन करताना
श्री.जनार्धन.मु.जाधव.
अध्यक्ष श्री.उदय दयाराम जाधव मार्गदर्शन करताना
अध्यक्ष श्री.उदय दयाराम जाधव.

संस्था शतक महोत्सवाकडे झेप घेताना आपले श्रद्धास्थान श्री जुगाई मातेचे मंदिराचे नवनिर्माण व्हावे अशी मनोकामना प्रकट करताना,मंदिर शतक महोत्सवा पूर्वी व्हावे असे सर्वांचे मत आहे.त्या साठी आपण आज पासूनच तयारी करावी असे सभेत मांडण्यात आले.शेवटी आरती,जाप होऊन,सोने लुटण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावर्षी एकंदरीत विधार्थी सत्कारासाठी आले नाहीत.खरे तर बक्षिसे त्यांचे साठी असतात .वडिलधाऱ्यानि आपल्या मुला मुलीना गावाविषयी माहिती द्यावी असी अपेक्षा आहे.बक्षीसांची संख्या १० झाली आहे.दर वर्षी त्यात भर पडते आहे.गेल्या वर्षीपासून आपण पंचक्रोशीतून शालान्त परीक्षेत प्रथम येणाऱ्या विधार्थ्यास कै.अजित विश्वनाथ जाधव यांचे स्मृती साठीचे  पारितोषिक देतो,यावर्षी ते कै.दादासाहेब सरफरे शाळेच्या कुमार.अजित सुरेश राणे राहणार( मौजे शिवणे ) यास देण्यात आले.शालान्त परीक्षेत त्यास ९३.८२% गुण मिळाले.त्याचे श्री जुगाई सेवा संघा तर्फे हार्दिक अभिनंदन.




Wednesday, October 5, 2011

श्री जुगाई सेवा संघातर्फे दिले जाणारे शैक्षणिक पुरस्कार ...

श्री जुगाई सेवा संघातर्फे दिले जाणारे शैक्षणिक पुरस्कार ...
१) शालान्त परीक्षेत सर्वप्रथम येणाऱ्या विध्यार्थ्यास ;
     (कै) सौ.मंदाकिनी शांताराम जाधव(सोंडवाडी) स्मृती पारितोषिक 
     सौजन्य : श्री.शांताराम केशव जाधव. 
२) शालान्त परीक्षेत सर्व प्रथम  व ७५% पेक्षा जास्त अधिक गुण 
     मिळविणाऱ्या विधार्थीणीस ;
     ( कै ).श्रीमती. यमुनाबाई भिकाजीराव जाधव(सोंडवाडी) स्मृती पारितोषिक
      सौजन्य : श्री.उमेश वामनराव जाधव. 
३)  बारावी(उच्च माध्यमिक) परीक्षेत सर्व शाखा मधून सर्व प्रथम येणाऱ्या विधार्थ्यास : 
      (कै) बाबाराम रामचंद्र जाधव(फौजदारवाडी ) स्मृती पारितोषिक
       सौजन्य : श्री.मिलिन बाबाराम जाधव.
४)  पदवी  परीक्षेत सर्व शाखा मधून सर्व प्रथम येणाऱ्या विधार्थ्यास :  
      (कै) श्रीमती.इंदिराबाई व (कै) श्री.बाबाजीराव दाजी जाधव(सोंडवाडी) स्मृती पारितोषिक 
       सौजन्य : श्री.चंद्रकांत बाबाजी जाधव आणि बंधू.  
५)    पदवी  परीक्षेत सर्व शाखा मधून सर्व प्रथम येणाऱ्या विधार्थ्यास :  
      (कै) दिनानाथ विश्वनाथ जाधव(मावळतची वाडी) स्मृती पारितोषिक
       सौजन्य : श्री. अमित दिनानाथ जाधव.
६)   पदवी  परीक्षेत सर्व शाखा मधून सर्व प्रथम येणाऱ्या विधार्थीणीस :
      (कै) सौ. शेवन्तीबाई काशीराम जाधव(सहानेची वाडी)  स्मृती पारितोषिक 
        सौजन्य : श्री. काशीराम राजाराम जाधव.
७)  अभियांत्रिकी पदवी वा पदव्युत्तर पदवी परीक्षेत  सर्व प्रथम येणाऱ्या विधार्थ्यास :
      (कै) नरहरी कृष्णाजी जाधव(सोंडवाडी) स्मृती पारितोषिक 
         सौजन्य : श्री. संजय नरहरी जाधव.
८)   अभियांत्रिकी पदवी वा सरकारमान्य पदविका परीक्षेत सर्व प्रथम येणाऱ्या विधार्थ्यास :
       (कै) बाबाजीराव दाजी जाधव(सोंडवाडी) स्मृती पारितोषिक 
       सौजन्य : श्री. रवींद्र बाबाजी जाधव.
९)  कोसुंब- बुरंबी पंचक्रोशीतील होतकरू यशस्वी विधार्थ्यास :
       (कै) अजित विश्वनाथ जाधव(सोंडवाडी) स्मृती पारितोषिक
      सौजन्य : श्री. रवींद्र व प्रकाश बाबाजीराव जाधव.
१०) कोसुंब गावात राहणाऱ्या व शालान्त परीक्षेत गावातून सर्व प्रथम येणाऱ्या विधार्थ्यास ;(या वर्षी)
       (कै)  बाबाजीराव दाजी जाधव(सोंडवाडी) स्मृती पारितोषिक
        सौजन्य : श्री. रवींद्र बाबाजीराव जाधव.

        हे सर्व पुरस्कार श्री जुगाई सेवा संघाच्या वार्षिक "दसरा स्नेह संमेलनात"  दिले जातात. 
                                  
        तसेच यावेळी सर्व पदवीधारांचा सत्कार करण्यात येतो. विशेष प्राविण्य   मिळविणाऱ्या 

        सभासदांचा सत्कार करण्यात येतो.आज पर्यंत पोलीसदलात  राष्ट्रपतीपदक कोसुंब 

         मधील ४ जणास मिळाले आहे,हि खचितच कौतुकाची बाब आहे.


         श्री. दिलीप सी. जाधव.














Thursday, September 29, 2011

गौरी- गणपती विसर्जन

गौरी- गणपती विसर्जन 
विसर्जनाची मिरवणूक 
विसर्जनासाठी एकत्र पूजेसाठी ठेवलेले गौरी-गणपती
नासिक ढोल, तासे,लेझीमच्या ठेक्यावर गौरी गणपती चे विसर्जन सर्व गावकरी एकत्र मिळून करतात.हिरव्या वनराईच्या पार्श्वभूमीवर सजलेल्या,नटलेल्या महिला व गौरी गणपती एक मनमोहक रंगाविष्कार .

Wednesday, September 21, 2011

.देव देवळात नाही ?

मुंबई                                                       //श्री जुगाई प्रसन्न //                    दिनांक ; १९/०२/२००८ 
                                                                                                                                 शिवजयंती
                           समस्त बारभाई ग्रामस्थ यांस सस्नेह नमस्कार.हे अनावृत्त पत्राचे  कारण म्हणजे गेल्या दोन महिन्यात आपला गावात घडलेल्या घटना होत.या पत्र द्वारे मनाची  घुसमट दूर करावी असा विचार मनात आला,म्हणून हा पत्र प्रपंच.
                          शी-वा-जी तीन धगधगत्या महाप्रतापी ज्वालाग्राही अक्षरांचा आपल्याला विसर  पडला कि काय ? सूर्यास हि लाजविणारी त्याची प्रतिभा क्षीण तर नाही ना झाली ? शिवरायांच्या नावाने श्वास घेणाऱ्या मराठा समाज्याची अशी सैरबैर अवस्था पाहून असे वाटणे अपरिहार्य आहे.पराभूत मनोवृत्तीच्या समाजात पुरोगामी विचारांचे बीज पेरणारे शिवराय  कायम पुरोगामीच होते.महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज पालथे जन्मले,सर्वत्र वार्ता पसरली आनंदाची.राजपुत्र झाला.पण कुणीतरी बोललेच,"राजे पालथे जन्मले,अपशकून झाला.आनंदावर जणू विरजण पडले.महाराजांचे कानी हि बातमी पोचली,महाराज लगेच म्हणाले,"आई भवानीनेच कौल दिला,राजपुत्र पालथा आला,आता सारी पातशाही तो पालथी घालील.अश्या अनेक प्रसंगांनी महाराज्यांनी आपल्याला जीवनाचा आदर्श शिकविला.सेनापती नेताजी पालकरचे शुद्धीकरण,परत हिंदू धर्मांतर हा असाच पुरोगामी विचार होता.
                                     आपल्या गावाचे काही गोमटे करावे,अश्या विचारांनी आपण सारेजण कामे करीत असतो.पण अश्या घटनांनी मन व्यथित होते.सारा विरस होतो.देव देवळात नाही,हा विचारच किती अविचारी.नाउमेद होते मन...... पण नवी उमेद देतात ते शिवरायच.दगड फोडताना १०० घाव फुकट गेल्या सारखे वाटतात,पण १०१ वा घाव यशस्वी होतो,दगडाच्या ठिकऱ्या उडतात.समाज परिवर्तनाचे गुंजे एवढे काम करताना,हा १०१ वा घावच यशस्वी होणार.श्री जुगाई आपल्या पाठीशी आहे,यश ती देणारच.
                                      समाज्यात प्रामाणिकपणे कार्य करीत असता,प्रत्येकाने विज्ञाननिष्ठ,विवेकी आणि तर्कशुद्ध विचारसरनीचा  अंगीकार करून,निर्भीडपणे निर्णय घावेत अशी अपेक्षा असते.काळ परवा पर्यंत योग्य दिशेने चालत असलेला आपला गाव अचानक दिशाहीन पालापाचोल्यागत सैरबैर व्हावा,याचेच दु:ख होते. गावात अनेक घटना घडल्या,काही निर्णय घेण्यात आले,त्यांची अंमलबजावणी करण्यात आली,त्या बाबतची साधी माहिती मुंबईत कळविण्यात आली नाही,म्हणजे आपण परत सन २००० चे अनुकरण करत नाही ना?अशी शंका येण्या इतपत या सर्व गोष्टी वाटतात.त्या मुळे परत काही मुलभूत प्रश्नांची उत्तरे शोधणे क्रम प्राप्त आहे.जी गेली अनेक वर्षे शोधात आहोत,पण सविस्तर मांडत नाही.श्री जुगाई सेवा संघाची उदधीष्टे कोणती ?त्याच्या कार्यकक्षा कोणत्या ?गावाचे धार्मिक,सामाजिक निर्णयात सहभाग काय ?त्याचे अधिकार कोणते ?एखाधा धार्मिक,सामाजिक निर्णयात मर्यादा कोणत्या ? ज्या जुगाई सेवा संघाने ग्रामस्थ मंडळाची नियुक्ती केली  त्यांचे अधिकार,कार्यकक्षा व मर्यादा याचे सखोल विवेचन आता अपरिहार्य आहे.
                                      रूढी,परंपरा मानव निर्मित असून कालानुरूप,प्रसंगानुरूप  त्यात बदल करणे आवश्यक आहे.सुतकाबाबत सर्व पर्याय पडताळून आपण सर्वांनी सन १९९६ पासून अनेक बैठका,चर्चासत्रे, घेऊन सर्व जेष्ठ सभासद,सर्व मानकरी,ग्रामस्थ आणि श्री जुगाईच्या साक्षीने अंतिम निर्णय दोन वर्षा पूर्वी घेतला.तो कालानुरूप योग्य आहे.त्याचे इतर समाज्याकडून आणि आजूबाजूच्या गावातून स्वागत झाले. सूतक मानव निर्मित असून,ते समाज बंधनाचे एक प्रभावी अस्त्र होते.जेव्हा समाज एकत्र लहान गाव व शहरात होता.आज तो अनेक प्रदेशात विखुरलेला आहे.धर्म,पंथ,जात,देश अश्या कक्षा ओलांडून सर्वत्र पसरलेला आहे.त्या मुळे कर्मकांडात अडकून रहाणे कठीण आहे.सूतक मानवास बंधनकारक देवास कसे ?जर तसे असते तर पाहुण्यान कडून देव पुजला नसता.गावाचा निर्णय सर्व समक्ष होता,सर्व मान्य होता.गावाचा निर्णय गाव करतो,कोणी तीरहाईत कसा काय करू शकतो ? मी फारच संभ्रमात पडलो आहे.आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाची मला गरज आहे.आम्ही सूतक पाळावे कि नाही ?सुतकाचे निर्णय लिखित स्वरुपात आहेत,ते कोणी व्यक्ती,कार्यकारिणी,वाडी व अन्यकोणीही व्यक्ती कशी काय बदलू शकते ?सर्वांनी दोन वर्षांपूर्वी मान्यता दिली आहे,मग हे नवे काय आहे ?
                              एकनाथांनी त्यांचे काळात समाजप्रबोधनासाठी भारुडांची रचना केली.देवाचे अस्तित्वा बद्दल भारुडात ते म्हणतात,
                                         एक नवल देखिले,चोराने एक गाव चोरिल,
                                         त्याचे मागे धावणे निघाले,चोर गाव नाहीसे झाले,
                                                      गावा नवता मुळीच पाया,वरला  गावकूस गेला वाया,
                                                      खंडून गेला मुळचा पाया,उडाले देऊळ देव गेला वाया//
चोराने एक गाव चोरले म्हणजे श्री विठ्ठलाने भक्ताचे चित्त रुपी गाव चोरले.चित्तास साठ्विणारा देह म्हणजे देऊळ,या देहावर मनाची सत्ता,पण ते तर सदैव वासनेच्या अधीन राहून खऱ्या सुखाची विस्मृती घडविते.असे चित्तच विठ्ठल रुपी चोराने चोरले,त्याला धरण्या साठी भक्त निघाले.पण विठ्ठलाच्या प्रभावाने भक्तच मुळी     चैतंन्यरुपी परब्रम्हात जातो,त्या मुळे विठ्ठल रुपी चोर व चित्तरुपी गाव दोन्ही नाहीसे होतात.आता मूळ प्रकृती चा भासच नाहीसा झाल्याने सगुण परमात्मा व त्याचे आधारे उभे असलेले विश्व रुपी देऊळ नाहीसे होते.हे प्रकृतीचे भास म्हणजेच सगुण देव,देहरूपी गाव,देऊळ,सारे उडून जाते.
तात्पर्य: भक्त जेव्हा ईश्वराच्या चिंतनात आपले चित्त एकाग्र केल्याने हरवतो,देहभान विसरतो,तेव्हा सर्व प्रकुतीचे खेळ संपून त्यास परब्रम्ह परमात्मा भेटतो.याला भागवतात निर्गुण निराकार देवभक्ती मानतात.हि भक्ताचे साधनेतील उच्चतम अवस्था मानली जाते.मग सगुण साकार व निर्गुण निराकार यात श्रेष्ठ भक्ती कोणती ?अर्थात निर्गुण निराकार भक्तीच.आमच्या मनात देव नसेल तर आम्ही तो देवळात कसा शोधणार ?
                      देव देव्हाऱ्यात नाही,देव नाही देव्हाऱ्यात.
                      देव चोरून नेईल,अशी कोणाची पुण्याई ?
आमची ग्रामदेवता श्री जुगाई आणि तिच्या परिवारातील देवता आमच्या मनामनात वसल्या आहेत.अगधी  प्रत्येकाच्या.मग त्या शोधताना अंत:करणात शोधल्या नाहीत का ?त्या साठी बाहेरचा माणूस पैसे देऊन बोलविलात.तो म्हणाला ते सर्व पटले ? आधी देव नव्हता, आता आला का ? नव्हता तर कुठे होता,कोणी चोरला  होता ?तो पुण्यवान कोण ?संतांची शिकवण व आपल्या सारख्या वडीलधाऱ्यांची मते अशी वेगळी असल्याने आमचे मनाचा गोंधळ उडाला आहे.त्या मुळेच आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे.
                   प्रतिगामी प्रवृतीना फट मिळाली,आपण करून दिली.पण त्याचे भगदाड होऊ नये या साठी आपण सर्वांनी सावधान राहले पाहिजे.अश्या प्रकारच्या घटनांनी समाज दोन पिढ्या मागे पडतो.आपल्या भावी पिढीवर याचा विपरीत परिणाम होऊन ती आपल्या पासून दूर जाते.प्रगत जगात असल्या भाकड कथा श्रद्धा न वाढविता अंधश्रद्धा वाढविण्यात मदद करतात.आपण सारे सूज्ञ आहात,माझी या द्विधा मनस्थितीतून सुटका करावी अशी मी सर्व वडीलधारी मंडळीना या पत्रा द्वारे विनंती करतो.येथेच थाबतो.

कळावे,
लोभ आहेच,तो वाढवा,
आपला कृपाभिलाषी,
दिलीप सीताराम जाधव.










                                  

Wednesday, September 14, 2011

कोसुंब जिल्हा परिषद शाळा न. २ मावळतची वाडी २०१० आदर्श शाळा

कोसुंब जिल्हा परिषद शाळा न. २ मावळतची वाडी २०१० आदर्श शाळा म्हणून गौरवण्यात आले.ग्रामस्थाच्या सहभागामुळे शाळेला हे यश मिळू शकले.ज्या ज्या लोकांनी शाळेला मदत केली त्या सर्वांच्या अपेक्षा विधार्थी आणि शिक्षकांनी पुर्या केल्या.त्या सर्वांचे श्री जुगाई सेवा संघा तर्फे अभिनंदन.

कोसुंब गावचा शिमगोत्सव

कोसुंब गावचा शिमगोत्सव. 
पालखीतील रूपे १८३४ साली नव्याने घडविण्यात आली
श्री जुगाई,श्री सुकाई,श्री पडलकारीन,श्री वरदान,श्री माउली ची पालखी
                                                                             
देवीची पालखी 

मानकरी व गुरव होमाची पूजा करताना
दीपक मानकरी व उदय मानकरी होमास अग्नी देताना


                                      
पालखी खाद्यावर घेऊन नाचताना बारभाई
 
आशीर्वाद घेताना श्री व सौ दिलीप सी. जाधव.
खणा नारळाने भरलेल्या देवींच्या ओट्या
पालखी हातावर खेळवताना
पालखी होमाभोवती मानकरी व बारभाई प्रदक्षिणा घालताना
प्रदक्षिणा
होम लागल्यावर पालखी खेलविताना
फाक पंचमी पासून गावात होलीकोत्सव साजरा करायला सुरवात होते.कातळखळाच्या  माळावर सर्व गावकरी जमतात आणि कोकड होळी पेटवतात.विविद  म्हणजे हुतुतू,आटापाट्ट्या सारखे मर्दानी खेळ खेळतात.
दिंड्याची खोडे तापउन ती कातळावर आपटून फटाक्या सारखा आवाज येतो,पूर्वी फटाके म्हणून याचा वापर होत असे.फाल्गुन शुद्ध त्रयोदशीला (तेरशी) माड म्हणजे आंबा किंव्हा माडाचा उभे खोड तोडून ते हातावर झेलत नाचवत सहाणेवर आणले जाते.यासाठी खूप दमछाक होते,अडचणीच्या ठिकाणी जर ते असेल तर फार कष्ट होतात.पण सर्व जण उत्साहाने माड खेळवतात,सहाणेवर  माड पाना-फुलांनी  सजविला जातो,एका विशीष्ठ ठिकाणी छोटा खड्डा करून त्यात माड उभा केला जातो.माड उभा करण्यासाठी जाड वासे कैच्या करून टेकू लावतात.हि एक अजब कला आहे,त्या साठी ताकत आणि डोके वापरावे लागते.
          दुसऱ्या दिवशी फाल्गुन शुध्द चतुर्दशीला सायंकाळी सर्व बारभाई श्री जुगाईच्या मंदिरात जमतात.देवींची चांदीची रूपे सोन्याच्या दागिन्यांनी सजविली जातात,ती पालखीत बसउन पालखी आकर्षकपणे सजविली जाते.पालखी रूपे बसविणे,ती सजवणे हि पण एक अवघड कला आहे,कारण पालखी नाचविताना रूपांना व सोम्बाचा पिंडीला कोठलाही धक्का लागणार नाही अशी काळजी घावी लागते.हि रूपे म्हणजे देविंचीच प्रतीरूपे असतात.या मागची संकल्पना अशी असावी कि,गावच्या रक्षणासाठी या ग्रामदेवता आपल्या सर्व देवता परिवारा समवेत प्रदक्षिणे साठी देवळा बाहेर पडतात.आपण काळजीपूर्वक याचा विचार केला तर पालखी गावतील सर्व ठिकाणी जाते व आपल्यातील शक्तीने ग्रामदेवता सर्व वाईट शक्तींना गावच्या सीमेबाहेर अटकाव करतात.याला रूढ अर्थाने सीमा बांधणे असे म्हणतात.लौव्किक पणे हे खरे असावे,तशीच धारणा सर्व कोकण प्रदेशात आहे.सनई,ढोल,तासे यांच्या तालावर पालखी नाचवत नाचवत सहाणेवर आणली जाते.
कोसुंब गावची बारभाई विभागाची सहान(सहानेची वाडी )
फाल्गुन शुद्ध पौर्णिमा या दिवशी सायंकाळी सहाण भरते,म्हणजे सर्व बारभाई सहाणेवर जमतात.देवींची पालखी नाचवतात.रात्री मनाचे नमन (खेळे) होते,सर्वजण खेळे आवडीने पाहतात.हि लोककला जी थोडी फार जगली आहे ती या शिमगोत्स्वामुळे,(याच्या विषयी सविस्तर पोस्ट लिहीन).सर्व एकत्रित पणे खेळ्याची मजा लुटतात.
फाल्गुन वद्य प्रतीपदा या दिवशी सकाळी सर्व बारभाई सहाणेवर नटून सजून जमतात.आजचा दिवस मोठ्या आनंदाचा,पारंपारिक वेषात सजलेल्या माता,भगिनी,माहेरवासिनी,सासुरवासिनी,अबाल वृद्ध सारे वेगळ्याच उत्साहात एकमेकांना भेटतात,होळीच्या शुभेच्छा देतात.सहानेच्या मळीत गवताची होळी उभारण्यात येते,इतर ठिकाणी आपण लाकडाची होळी पाहतो,पण हि होळी गवताच्या गंजी रचून करतात.पाच मानकरी म्हणजे मोठ्या घराण्याचे प्रमुख व सर्व बारभाई समाज्याचे प्रमुख मानकरी,मधल्या घराण्याचे मानकरी,धाकट्या घराण्याचे मानकरी,सुतार मानकरी आणि कुणबी मानकरी होळीची पूजा करतात.पालखी नाचवत खेळवत होळी भोवती प्रदक्षिणा घालतात,नवीन लग्न झालेली जोडपी होळीला नारळ अर्पण करण्या साठी आवर्जून गावी येतात व आपले  पुढील आयुष सुखी समाधानी व्हावे या साठी देवीला साकडे घालतात,तसेच गावातील वडिल धाऱ्यांचे आशीर्वाद घेतात.हे संस्कारित मूल्य आपण अजून जपले आहे.  सर्व मानकरी माना प्रमाणे होमला अग्नी देतात.नारळ अर्पण करतात.सर्वजण होळीची पूजा करतात.पालखी पुन्ह्या मनसोक्त नाचविली जाते.यावेळी ओरडून देवीची महती गातात त्याला 'फाक' म्हणतात.नाचून झाल्यावर पालखी परत सहाणेवर आणतात.सर्व बारभाई,त्यांचे नातेवाईक पूजा करतात,नैवध्य,प्रसाद दाखवतात.माहेरवासिनी श्री पडलकरीन देवीची खाणा नारळाने ओटी भरतात.सासुरवासिनी श्री जुगाई व इतर देवतांच्या ओट्या भरून आशीर्वाद मागतात.सर्व पूज्या झाल्यावर आपले मोठे मानकरी देवीना जाप करतात आणि सर्वासाठी आशीर्वाद मागतात.सर्व नवस फेडले जातात.नवीन नवस बोलले जातात.रात्री नमनाचा(खेळे) कार्यक्रम मुंबईकरग्रामस्था तर्फे आयोजण्यात येतो.
             फाल्गुन वध्य द्वितिया या दिवशी देवींचे विडे भरण्याचा विधी जंगम पुजाऱ्या मार्फत केला जातो.सर्व पाच मानकरी व बारभाई समवेत विडे भरल्यावर पालखी सहानेवरून शिपन्यासाठी प्रथम मोठ्या मानकरी श्री.दयारामदादा . यांचे कडे जाते.आपल्या देवींचे सर्व अधिकार या घरी आहेत.पालखी तेथून मधल्या मानकरी श्री.दीपक मनोहर (मळे वाडी) यांचे कडे जाते.तेथून पालखी धाकटे मानकरी श्री.सुभाष  शंकर यांचे कडे पूजे साठी येते.मग पालखी सुतार मानकरी कडे जाते.त्या नंतर पालखी इतर बारभाई विभागातील फौजदार वाडी,मावळतची  वाडी,सहानेची वाडी,श्री विठाबाई स्थान पूजा,कातळवाडी,पातालेवाडी,श्री तलेकरीन पूजा,सोंड वाडी,फुगीची वाडी,श्री पडलकरीन पूजा,तेथून श्री सुखाई पूजा,सर्व घरे व देवस्थानात  पूजा झाल्यावर राखण दिली जाते व पालखीतील रूपे काढली जातात.दर तीन वर्षांनी देवींची  मूळ स्थानके समजावली जातात,म्हणजे पालखी सवाद्ध मानकरी समवेत स्थानका कडे पालखी नेऊन पूजा केली जाते,परत देवळात पालखी आणून मूळ स्थानक व देवळातील देवी भेटविल्या जातात.(हेतू विषयी वेगळे विवेचन पुढील पोस्ट मध्ये).या प्रकारे आपल्या गावचा शिमगोत्सव साजरा केला जातो.
                         पालखी बारभाई  विभागातील प्रत्येक घरात पूजे साठी नेली जाते.या मागील धारणा अशी आहे कि,देवी आपल्या घरात येऊन पुढील एका वर्षा साठी आपले रक्षण करते,आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करते.गुरव त्या प्रमाणे जाप  करतात.सर्व घरातील सुहासिनी ओटी भरतात.
(मला असलेल्या माहिती प्रमाणे वरील लिखाण केले आहे,यात त्रुटी असू शकतात.जर कोणास अधिक माहिती असल्यास माझाशी संपर्क साधावा.)


       

Monday, September 12, 2011

गणेश उत्सव स्प्रिंग मिल कॉमपौंड २०११

श्री.उदय अनंत डावल यांचे मार्गदर्शना खाली हा देखावा बनविण्यात आला.
 चलत चित्र
हिमालयातील कैलास पर्वत गणेश उत्सव स्प्रिंग मिल कॉमपौंड २०११
शिवतांडव
शेषनाग 

प्रवेशद्वार
.        आपल्या गावचे सुपुत्र श्री उदय अनंत डावल यांचे मार्गदर्शना खाली स्प्रिंग मिल कॉमपौंड गणेश उत्सव मंडळ नायगाव येथील कैलाश पर्वताचा देखावा साकार करण्यात आला.सर्व कोसुंब ग्रामास्थ्या तर्फे  त्याचे कौतुक  आणि अभिनंदन.

Sunday, July 31, 2011

जागर


विविध तिथी ,धार्मिक कार्यक्रमांची सविस्तर माहिती

जागर  : प्रत्येक वर्षाच्या श्रावण शुद्ध त्रीओदशीला जागर उत्सव केला जातो.
त्या दिवशी दुपारी चे सुमारास सर्व मानकरी सर्व बारभाई विभागातील
गावकरी श्री जुगाईचे  देवळात जमतात.गुरव देवींची यथासांग पूजा करतात.
प्रमुख मोठे मानकरी देवीचा जाप करतात.सर्व देवींना पोवते (जानवे) अर्पण
(घातले)केले  जाते.
दुसऱ्या  दिवशी गुरव प्रथम मोठ्या मानकऱ्या पासून सुरवात करून हे पोवते
(जानवे दोर) सर्व गावातील (फक्त बारभाई विभागातील ) घरामध्ये पोहचवतो.
         पोवते हा यज्ञोपवित या पासून  आला असावा,कदाचित पवितचे पोवते झाले
असावे असे वाटते. 

Sunday, July 24, 2011

श्री जुगाई देवीचे वार्षिक सन -उत्सव-तिथी

श्री जुगाई देवीचे वार्षिक सन-उत्सव-तिथी
 
    
सन-उत्सव-तिथी                                          साजरी करण्याची पद्धत (थोडक्यात)
    १)      जागर                                                                         देव पोवते व गाव पोवते    

   
)      हौसा                                                                         गौरीच्या हौश्या प्रमाणे
    
नाम साप्ताह                                                                दिवस आणि रात्री नाम संकीर्तन अखंड जागरण,
                                                                                                    
वाडीवार / तासाचे पहारे,सुरवात शेवट अखंड    बारभाई
                                                                                                    
ललित आणि प्रसाद


   
)  उद्यापन                                                                            नाम सप्ताहाची सांगता,ब्राह्मण पूजा,
ब्राह्मणासह 
                                                                               मानकरी भोजन.

   
)  दिवाळी                                                                            दोन्ही दिवाळीला देवाला तैल स्नान दिवे लावणे.

   
) त्रिपुरारी पूर्णिमा                                                          कोह्ल्यात पणती तयार करून तेल वाट करून दिपमालेवर
                                                                                                      
लावणे.दीपमाल,देऊळ,देऊळ परिसरात पणत्या लावणे,
                                                                                                            भजन                                         

 
) होलिकोत्सव                                                                फाक पंचमी,तेरशी शेंडा (होळी) उभा करणे,देवींची रूपे लाऊन 

                                                                         पालखी सजविणे व पालखी सहाणेवर आणणे.सहान भरते.
                                                                         रात्री नमन,होम लावणे,सहाणेवर नवस बोलणे व फेडणे.
                                                                         विडे भरणे(जंगम विधी),तिन्ही मानकरी कडे पालखीचे
                                                                         शिंपणे.सर्व गावाचे शिंपणे.फेरा पूर्ण होताच राखण देणे.
 
                                                                                              


 
) स्थानके भेटवणे                                                            दर तिसऱ्या वर्षी शिंपण्याअखेर  मानकरिनी  स्थानका कडे

                                           सवाद्ध जाऊन  स्थानक पूजा करून देवळात 
                                येऊन प्रार्थना करणे.या प्रमाणे प्रत्येक स्थानक 
                                समजावणे.शेवटी देवलाजवळ उंच ठिकाणी
                                  निशाण लावणे.
 ९) महाशिवरात्री उत्सव                                                    सत्यनारायणाची महापूजा जुगाई मंदिरात,सर्व देवींची,
                                 श्री महादेवाची पूजा, भंडारा,रात्री कीर्तन,भजन