Wednesday, January 29, 2014

मागील पोस्त मध्ये कबुल केल्या प्रमाणे यादव वंशातील ज्ञात राज्यांची माहिती देण्याचे मी म्हटले होते,पण काही कारणाने त्यास उशीर झाला.हेमाद्री पंडिताने व्रतखंडातील राजप्रशस्तीत यादवांचे मूळ प्रदेशाचे नाव "सेउनदेश"वा सेऊनमंडळ व राजधानीचे नाव सेऊन नगर असे दिलेले आहे.हे त्याचे म्हणणे त्यानंतर सापडलेल्या शीला व ताम्रपटाने खरे ठरले आहे,दान दिलेल्या गावांच्या नावांवरून हा सेऊन देश नासिक,नगर,औरंगाबाद या भागाला म्हणत असावे असे दिसते.यादवांच्या साम्राज्याचा विस्तार हा पश्चिमे कडून पूर्वे कडे असा झालेला दिसतो.त्या काळातील काही कवी,ग्रंथकार यादवांचा सेऊन भूपाल असा करतात.थोडक्यात दृढप्रहार हा यादव कुळातील प्रतम ज्ञात नृपती असून त्याचे राज्याचा प्रारंभ याच सेऊनदेश्या पासून झाला.आपण ठरल्या प्रमाणे याच दृढ प्रहरी पासून सुरवात करून यादवांचा दैदीप्यमान इतिहासाचा आढावा घेण्याच्या प्रयत्न करू या.
दृढ प्रहार वा दृढप्रहरी :
हेमाद्री वा हेमाडपंत यादवांच्या पौराणिक राज्याचा व्रज-प्रतीबाहु-सुबाहु असा क्रम लावतो.याच सुबाहु ने आपले राज्य चार मुलांना वाटून दिले.त्यात त्याचा पुत्र दृढप्रहार यास दक्षिणे कडील भाग मिळाला.सुबाहु पूर्वीचे राजे द्वारावती प्रदेश्यातील होते,श्रीकृष्णा पासून ते द्वारकेत आले.डॉ.रा.गो.भांडारकरांनी यास पुष्टी दिली आहे.दृढ प्रहरी हा अतिशय कष्टाने व स्वकर्तुत्वाने राजा झाला.तो तरुण असतानाच पराक्रमी योद्धा होता.त्याने गावावरील चोरांचे आक्रमण मोठ्या शौर्याने परतून लावले,त्यामुळे त्यास नगररक्षक पद मिळाले.याच सेऊनदेश्यात पुढे त्याने आपले राज्य स्थापले.या पराक्रमी राजाचा वसई ताम्रपटात तसा उल्लेख आहे.यानेच चंद्रदित्यपूर आजचे चांदोर व श्रीनगर म्हणजे सिन्नर हि गावे वसवली.याचा काळ साधारण ८६० ते ८८० इसवी असावा.याच काळात अमोघवर्ष प्रथम हा दुर्बल सम्राट राष्ट्रकूट गादीवर होता.त्यास वेन्गीचे चालुक्य,गंगवडीचे गंग व माळव्याचे परमार याचा सतत त्रास असे.त्यामुळे सेउनदेश प्रदेशात त्याला प्रहरी सारखा पराक्रमी सामंत असणे आवश्यक होते.याचा दृढप्रहारीने अचूक फायदा उचलला.त्यानंतर गादीवर आलेल्या सेऊनचंद्र प्रथम याची माहिती पुढील वेळी घेऊ या.

No comments:

Post a Comment