Monday, July 1, 2013

lok-jagar

कीर्तन एक समाज प्रबोधानाचे माध्यम .
शिक्षणा पासून वंचित ठेवलेल्या जनतेच्या ज्ञाणासाठी संत मंडळींनी कीर्तनाचा चांगला वापर केला.
लोक भाषेत ज्ञान दान करताना कीर्तना सारखे सोप्पे,लोकसहभाग असलेले व सर्वांस सामाऊन घेणारे लोक माध्यम संत परंपरेने निवडले.कारण जर त्या काळातील काही रूढी परमपराना छेद देणारे ज्ञान मंदिरात सांगितले असते तर त्याला अनेक अडथळे निर्माण झाले असते,पण मान्दिरांबाहेर पारावर,वाळवंटात कीर्तनाचे व्यासपीठ उभारणात संताची लोकोत्तर हुशारी आपल्या ध्यानात येते.
संतानी कीर्तन परमार्थ साधने पुरते मर्यादित न ठेवता,ते ज्ञान प्रसाराचे माध्यम बनविले.संत म्हणजे समाज शिक्षक,त्याने कीर्तन हे समाज प्रबोधनाचे मध्यम स्वीकारले हे त्यांचे तर्कबुद्धी व विवेक बुद्धीस अनुसरूनच. संतांनी विशेषत: नामदेव महाराजांनी कीर्तन,भारुड या लोक रंजनाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य केले.कीर्तन जरी नवविधा भक्ती मधील दुसऱ्या क्रमाकाचे भक्ती साधन असले तरी संतानी ते ज्ञान प्रसाराचे माध्यम बनविले.
"भक्तीचिया पोटी बोध काकडा ज्योती"असा ज्ञान आणि भक्ती याचा सांधा साधला.ज्ञानदेवांच्या मते ज्ञान हे कर्माचे डोळे आहेत. कर्मा मागील दृष्टि जर निर्दोष असेल तर अमंगलाचा फैलाव होणार नाही.त्या साठी विवेकाचे अंजन घालावे लागते."दुरितांचे तिमिर जावो" हे अभिप्रेत असता अंधार दूर होण्यासाठी नीतिवान कीर्तनकारांची गरज आज भासते आहे.तीनशे वर्षान पासून कीर्तने,प्रबोधने चालू असताना आज काय परिस्थती आहे हे पहाणे अगत्याचे ठरते.
आज सर्वत्र मोठ्या उत्साहाने हरीनाम साप्ताह,कीर्तनाचे,भजनाचे कार्यक्रम केले जातात.पण दुसरी कडे पापाचार बोकाळला आहे.देवाचे देवळातहि दर्शना साठी,प्रसादा साठी पैसे मोजले जातात.सप्ताहाचे महत्व आता रूढी,परंपरा या चाकोरीत अडकलेले पहायला मिळते.त्या मागचा मूळ हेतू विचारात न घेता त्याचे आयोजनातील क्रम,कालबाह्य रूढी, त्यांचे अनाकलनीय समर्थन हेच चित्र दिसते.त्यामुळे नवीन पिढी जी मूळातच बुद्धिवादी,चौकस,तर्कनिष्ठ असल्याने या एका उत्तम प्रबोधन मध्यमा पासून दूर जाताना दिसते.काही वेळा तर देवळातील देवाचे अस्तीत्वालाच नाकारण्या पर्यंत काही लोकांची मजल जाते.असे का बरे होते?काहीतरी चुकते आहे हे मात्र खरे.

No comments:

Post a Comment