रूढी परंपरा यांचे जू आपण सतत वाहत असतो ,त्या बाबत कोणती भूमिका घ्यावी याचा विचार होणे आता अपरिहार्य आहे. आपण सारे या विषयी सभ्रमात असतो. कारण हा विषय इतका जटील आहे कि ,त्याला थेट भिडणे अनेक जन टाळतात. मग एक तर ते जसे आहे तसे स्वीकारले जाते,वा परमपराचा संपूर्ण विरोध केला जातो. तसे पाहिले तर दोन्ही भूमिका सदोष आहेत. कोणत्याही रुढीचा स्वीकार वा विरोध यात तर्कदृष्टी वा विवेकाचा विचार केला जात नाही.
मग हि कोंडी कशी सुटणार?संतानी यावर मांडलेला विचार विलक्षण आग्रही थेट भिडणारा, तितकाच विवेकी व कालातीत आहे.
वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरा, रूढी, जनरीत, श्रद्धा हे मुळातच न बदलता येणाऱ्या आहेत या भावनेतून आपले मन दृढ झालेले असते, या पूर्व संचितांचा हिशेब मांडण्याचे धेर्य आपण दाखवत नाही. परंपरा आणि चालीरीती यात कालातीत किती? कालसाक्षेप किती?त्या आजच्या कळशी सुसंगत आहेत कि विसंगत या कळीच्या मुद्द्याला सहसा भिडणे आपण टाळतो. प्रथा, परंपरा, रूढी आपल्या मानगुटीवर घेऊन आपण त्या जपण्याच्या नावाखाली त्यांच्या ओझ्याखाली भरडले जातो .मग परंपरांचे आपण भारवाहक होतो, डोळस वारसदार नाही. यावर काही उपाय आहे का?आहे, अगधी समर्पक आहे. संत अभंगात, ओव्या मधून यावर भरपूर विचार व उपाय शिकविलेले आहेत .या विषयांना थेट भिडण्याचे धेर्य ३०० वर्ष्यापूर्वीच संतानी दाखविले आहे.ते आजही समाजास पथदर्शक आहे.
अनेक संतानी रूढी, परंपरा यावर भरपूर भाष्य व लिखाण केले आहे. ज्ञानेश्वर लिहितात"तैसे ज्ञाणीये जे होती!ते वेदार्थाते विवरती! मग अपेक्षित ते स्वीकारती! शाश्वत जे! "श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात खरा विवेकी माणूस वेदाचेही विवरण करतो, त्यातील कालबाह्य अंश फेकून देतो व जो शाश्वत त्याला त्या वेळी जी अपेक्षित व आवश्यक भागच स्वीकारतो हा या ओवीचा अर्थ आहे. कोणत्याही रूढ परंपरांना कालबाह्य ठरउन नीरक्षीरविवेकाने त्याचा स्वीकार करण्याची दृष्टी व धेर्य संत विचारातून आपण मिळते.वेद काही बोलोत मला अपेक्षित व पटणारा भाग मी स्वीकारीन असे ठासून सांगणारी ओवी "वेद अनंत बोलीला! अर्थ इतुकाची साधिला! विठोबाशी शरण जावे!निजनिष्ठा नाम गावे!"हा विवेकी विचार हा तुकोबांचा बाणा होता. कित्तेक परंपरा वा कर्मकांडात्मक रूढीना समोर जाण्याचे धाडस या अस्सल विवेकनिष्ठेत सापडते. रूढी परंपरांचा निर्बुद्धपणे स्वीकार न करता कालानुरूप विवेकाची कसोटी लाऊन उपयुक्त तोच भाग डोळसपणे स्वीकारून इतराचे प्रबोधन करून रूढी परंपरांचा स्वीकार करणे हि आजची गरज आहे.
वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरा, रूढी, जनरीत, श्रद्धा हे मुळातच न बदलता येणाऱ्या आहेत या भावनेतून आपले मन दृढ झालेले असते, या पूर्व संचितांचा हिशेब मांडण्याचे धेर्य आपण दाखवत नाही. परंपरा आणि चालीरीती यात कालातीत किती? कालसाक्षेप किती?त्या आजच्या कळशी सुसंगत आहेत कि विसंगत या कळीच्या मुद्द्याला सहसा भिडणे आपण टाळतो. प्रथा, परंपरा, रूढी आपल्या मानगुटीवर घेऊन आपण त्या जपण्याच्या नावाखाली त्यांच्या ओझ्याखाली भरडले जातो .मग परंपरांचे आपण भारवाहक होतो, डोळस वारसदार नाही. यावर काही उपाय आहे का?आहे, अगधी समर्पक आहे. संत अभंगात, ओव्या मधून यावर भरपूर विचार व उपाय शिकविलेले आहेत .या विषयांना थेट भिडण्याचे धेर्य ३०० वर्ष्यापूर्वीच संतानी दाखविले आहे.ते आजही समाजास पथदर्शक आहे.
अनेक संतानी रूढी, परंपरा यावर भरपूर भाष्य व लिखाण केले आहे. ज्ञानेश्वर लिहितात"तैसे ज्ञाणीये जे होती!ते वेदार्थाते विवरती! मग अपेक्षित ते स्वीकारती! शाश्वत जे! "श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात खरा विवेकी माणूस वेदाचेही विवरण करतो, त्यातील कालबाह्य अंश फेकून देतो व जो शाश्वत त्याला त्या वेळी जी अपेक्षित व आवश्यक भागच स्वीकारतो हा या ओवीचा अर्थ आहे. कोणत्याही रूढ परंपरांना कालबाह्य ठरउन नीरक्षीरविवेकाने त्याचा स्वीकार करण्याची दृष्टी व धेर्य संत विचारातून आपण मिळते.वेद काही बोलोत मला अपेक्षित व पटणारा भाग मी स्वीकारीन असे ठासून सांगणारी ओवी "वेद अनंत बोलीला! अर्थ इतुकाची साधिला! विठोबाशी शरण जावे!निजनिष्ठा नाम गावे!"हा विवेकी विचार हा तुकोबांचा बाणा होता. कित्तेक परंपरा वा कर्मकांडात्मक रूढीना समोर जाण्याचे धाडस या अस्सल विवेकनिष्ठेत सापडते. रूढी परंपरांचा निर्बुद्धपणे स्वीकार न करता कालानुरूप विवेकाची कसोटी लाऊन उपयुक्त तोच भाग डोळसपणे स्वीकारून इतराचे प्रबोधन करून रूढी परंपरांचा स्वीकार करणे हि आजची गरज आहे.
No comments:
Post a Comment