Thursday, September 29, 2011
Wednesday, September 21, 2011
.देव देवळात नाही ?
मुंबई //श्री जुगाई प्रसन्न // दिनांक ; १९/०२/२००८
शिवजयंती
समस्त बारभाई ग्रामस्थ यांस सस्नेह नमस्कार.हे अनावृत्त पत्राचे कारण म्हणजे गेल्या दोन महिन्यात आपला गावात घडलेल्या घटना होत.या पत्र द्वारे मनाची घुसमट दूर करावी असा विचार मनात आला,म्हणून हा पत्र प्रपंच.
शी-वा-जी तीन धगधगत्या महाप्रतापी ज्वालाग्राही अक्षरांचा आपल्याला विसर पडला कि काय ? सूर्यास हि लाजविणारी त्याची प्रतिभा क्षीण तर नाही ना झाली ? शिवरायांच्या नावाने श्वास घेणाऱ्या मराठा समाज्याची अशी सैरबैर अवस्था पाहून असे वाटणे अपरिहार्य आहे.पराभूत मनोवृत्तीच्या समाजात पुरोगामी विचारांचे बीज पेरणारे शिवराय कायम पुरोगामीच होते.महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज पालथे जन्मले,सर्वत्र वार्ता पसरली आनंदाची.राजपुत्र झाला.पण कुणीतरी बोललेच,"राजे पालथे जन्मले,अपशकून झाला.आनंदावर जणू विरजण पडले.महाराजांचे कानी हि बातमी पोचली,महाराज लगेच म्हणाले,"आई भवानीनेच कौल दिला,राजपुत्र पालथा आला,आता सारी पातशाही तो पालथी घालील.अश्या अनेक प्रसंगांनी महाराज्यांनी आपल्याला जीवनाचा आदर्श शिकविला.सेनापती नेताजी पालकरचे शुद्धीकरण,परत हिंदू धर्मांतर हा असाच पुरोगामी विचार होता.
आपल्या गावाचे काही गोमटे करावे,अश्या विचारांनी आपण सारेजण कामे करीत असतो.पण अश्या घटनांनी मन व्यथित होते.सारा विरस होतो.देव देवळात नाही,हा विचारच किती अविचारी.नाउमेद होते मन...... पण नवी उमेद देतात ते शिवरायच.दगड फोडताना १०० घाव फुकट गेल्या सारखे वाटतात,पण १०१ वा घाव यशस्वी होतो,दगडाच्या ठिकऱ्या उडतात.समाज परिवर्तनाचे गुंजे एवढे काम करताना,हा १०१ वा घावच यशस्वी होणार.श्री जुगाई आपल्या पाठीशी आहे,यश ती देणारच.
समाज्यात प्रामाणिकपणे कार्य करीत असता,प्रत्येकाने विज्ञाननिष्ठ,विवेकी आणि तर्कशुद्ध विचारसरनीचा अंगीकार करून,निर्भीडपणे निर्णय घावेत अशी अपेक्षा असते.काळ परवा पर्यंत योग्य दिशेने चालत असलेला आपला गाव अचानक दिशाहीन पालापाचोल्यागत सैरबैर व्हावा,याचेच दु:ख होते. गावात अनेक घटना घडल्या,काही निर्णय घेण्यात आले,त्यांची अंमलबजावणी करण्यात आली,त्या बाबतची साधी माहिती मुंबईत कळविण्यात आली नाही,म्हणजे आपण परत सन २००० चे अनुकरण करत नाही ना?अशी शंका येण्या इतपत या सर्व गोष्टी वाटतात.त्या मुळे परत काही मुलभूत प्रश्नांची उत्तरे शोधणे क्रम प्राप्त आहे.जी गेली अनेक वर्षे शोधात आहोत,पण सविस्तर मांडत नाही.श्री जुगाई सेवा संघाची उदधीष्टे कोणती ?त्याच्या कार्यकक्षा कोणत्या ?गावाचे धार्मिक,सामाजिक निर्णयात सहभाग काय ?त्याचे अधिकार कोणते ?एखाधा धार्मिक,सामाजिक निर्णयात मर्यादा कोणत्या ? ज्या जुगाई सेवा संघाने ग्रामस्थ मंडळाची नियुक्ती केली त्यांचे अधिकार,कार्यकक्षा व मर्यादा याचे सखोल विवेचन आता अपरिहार्य आहे.
रूढी,परंपरा मानव निर्मित असून कालानुरूप,प्रसंगानुरूप त्यात बदल करणे आवश्यक आहे.सुतकाबाबत सर्व पर्याय पडताळून आपण सर्वांनी सन १९९६ पासून अनेक बैठका,चर्चासत्रे, घेऊन सर्व जेष्ठ सभासद,सर्व मानकरी,ग्रामस्थ आणि श्री जुगाईच्या साक्षीने अंतिम निर्णय दोन वर्षा पूर्वी घेतला.तो कालानुरूप योग्य आहे.त्याचे इतर समाज्याकडून आणि आजूबाजूच्या गावातून स्वागत झाले. सूतक मानव निर्मित असून,ते समाज बंधनाचे एक प्रभावी अस्त्र होते.जेव्हा समाज एकत्र लहान गाव व शहरात होता.आज तो अनेक प्रदेशात विखुरलेला आहे.धर्म,पंथ,जात,देश अश्या कक्षा ओलांडून सर्वत्र पसरलेला आहे.त्या मुळे कर्मकांडात अडकून रहाणे कठीण आहे.सूतक मानवास बंधनकारक देवास कसे ?जर तसे असते तर पाहुण्यान कडून देव पुजला नसता.गावाचा निर्णय सर्व समक्ष होता,सर्व मान्य होता.गावाचा निर्णय गाव करतो,कोणी तीरहाईत कसा काय करू शकतो ? मी फारच संभ्रमात पडलो आहे.आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाची मला गरज आहे.आम्ही सूतक पाळावे कि नाही ?सुतकाचे निर्णय लिखित स्वरुपात आहेत,ते कोणी व्यक्ती,कार्यकारिणी,वाडी व अन्यकोणीही व्यक्ती कशी काय बदलू शकते ?सर्वांनी दोन वर्षांपूर्वी मान्यता दिली आहे,मग हे नवे काय आहे ?
एकनाथांनी त्यांचे काळात समाजप्रबोधनासाठी भारुडांची रचना केली.देवाचे अस्तित्वा बद्दल भारुडात ते म्हणतात,
एक नवल देखिले,चोराने एक गाव चोरिल,
एकनाथांनी त्यांचे काळात समाजप्रबोधनासाठी भारुडांची रचना केली.देवाचे अस्तित्वा बद्दल भारुडात ते म्हणतात,
एक नवल देखिले,चोराने एक गाव चोरिल,
त्याचे मागे धावणे निघाले,चोर गाव नाहीसे झाले,
गावा नवता मुळीच पाया,वरला गावकूस गेला वाया,
खंडून गेला मुळचा पाया,उडाले देऊळ देव गेला वाया//
गावा नवता मुळीच पाया,वरला गावकूस गेला वाया,
खंडून गेला मुळचा पाया,उडाले देऊळ देव गेला वाया//
चोराने एक गाव चोरले म्हणजे श्री विठ्ठलाने भक्ताचे चित्त रुपी गाव चोरले.चित्तास साठ्विणारा देह म्हणजे देऊळ,या देहावर मनाची सत्ता,पण ते तर सदैव वासनेच्या अधीन राहून खऱ्या सुखाची विस्मृती घडविते.असे चित्तच विठ्ठल रुपी चोराने चोरले,त्याला धरण्या साठी भक्त निघाले.पण विठ्ठलाच्या प्रभावाने भक्तच मुळी चैतंन्यरुपी परब्रम्हात जातो,त्या मुळे विठ्ठल रुपी चोर व चित्तरुपी गाव दोन्ही नाहीसे होतात.आता मूळ प्रकृती चा भासच नाहीसा झाल्याने सगुण परमात्मा व त्याचे आधारे उभे असलेले विश्व रुपी देऊळ नाहीसे होते.हे प्रकृतीचे भास म्हणजेच सगुण देव,देहरूपी गाव,देऊळ,सारे उडून जाते.
तात्पर्य: भक्त जेव्हा ईश्वराच्या चिंतनात आपले चित्त एकाग्र केल्याने हरवतो,देहभान विसरतो,तेव्हा सर्व प्रकुतीचे खेळ संपून त्यास परब्रम्ह परमात्मा भेटतो.याला भागवतात निर्गुण निराकार देवभक्ती मानतात.हि भक्ताचे साधनेतील उच्चतम अवस्था मानली जाते.मग सगुण साकार व निर्गुण निराकार यात श्रेष्ठ भक्ती कोणती ?अर्थात निर्गुण निराकार भक्तीच.आमच्या मनात देव नसेल तर आम्ही तो देवळात कसा शोधणार ?
देव देव्हाऱ्यात नाही,देव नाही देव्हाऱ्यात.
देव चोरून नेईल,अशी कोणाची पुण्याई ?
आमची ग्रामदेवता श्री जुगाई आणि तिच्या परिवारातील देवता आमच्या मनामनात वसल्या आहेत.अगधी प्रत्येकाच्या.मग त्या शोधताना अंत:करणात शोधल्या नाहीत का ?त्या साठी बाहेरचा माणूस पैसे देऊन बोलविलात.तो म्हणाला ते सर्व पटले ? आधी देव नव्हता, आता आला का ? नव्हता तर कुठे होता,कोणी चोरला होता ?तो पुण्यवान कोण ?संतांची शिकवण व आपल्या सारख्या वडीलधाऱ्यांची मते अशी वेगळी असल्याने आमचे मनाचा गोंधळ उडाला आहे.त्या मुळेच आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे.
प्रतिगामी प्रवृतीना फट मिळाली,आपण करून दिली.पण त्याचे भगदाड होऊ नये या साठी आपण सर्वांनी सावधान राहले पाहिजे.अश्या प्रकारच्या घटनांनी समाज दोन पिढ्या मागे पडतो.आपल्या भावी पिढीवर याचा विपरीत परिणाम होऊन ती आपल्या पासून दूर जाते.प्रगत जगात असल्या भाकड कथा श्रद्धा न वाढविता अंधश्रद्धा वाढविण्यात मदद करतात.आपण सारे सूज्ञ आहात,माझी या द्विधा मनस्थितीतून सुटका करावी अशी मी सर्व वडीलधारी मंडळीना या पत्रा द्वारे विनंती करतो.येथेच थाबतो.
कळावे,
लोभ आहेच,तो वाढवा,
आपला कृपाभिलाषी,
तात्पर्य: भक्त जेव्हा ईश्वराच्या चिंतनात आपले चित्त एकाग्र केल्याने हरवतो,देहभान विसरतो,तेव्हा सर्व प्रकुतीचे खेळ संपून त्यास परब्रम्ह परमात्मा भेटतो.याला भागवतात निर्गुण निराकार देवभक्ती मानतात.हि भक्ताचे साधनेतील उच्चतम अवस्था मानली जाते.मग सगुण साकार व निर्गुण निराकार यात श्रेष्ठ भक्ती कोणती ?अर्थात निर्गुण निराकार भक्तीच.आमच्या मनात देव नसेल तर आम्ही तो देवळात कसा शोधणार ?
देव देव्हाऱ्यात नाही,देव नाही देव्हाऱ्यात.
देव चोरून नेईल,अशी कोणाची पुण्याई ?
आमची ग्रामदेवता श्री जुगाई आणि तिच्या परिवारातील देवता आमच्या मनामनात वसल्या आहेत.अगधी प्रत्येकाच्या.मग त्या शोधताना अंत:करणात शोधल्या नाहीत का ?त्या साठी बाहेरचा माणूस पैसे देऊन बोलविलात.तो म्हणाला ते सर्व पटले ? आधी देव नव्हता, आता आला का ? नव्हता तर कुठे होता,कोणी चोरला होता ?तो पुण्यवान कोण ?संतांची शिकवण व आपल्या सारख्या वडीलधाऱ्यांची मते अशी वेगळी असल्याने आमचे मनाचा गोंधळ उडाला आहे.त्या मुळेच आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे.
प्रतिगामी प्रवृतीना फट मिळाली,आपण करून दिली.पण त्याचे भगदाड होऊ नये या साठी आपण सर्वांनी सावधान राहले पाहिजे.अश्या प्रकारच्या घटनांनी समाज दोन पिढ्या मागे पडतो.आपल्या भावी पिढीवर याचा विपरीत परिणाम होऊन ती आपल्या पासून दूर जाते.प्रगत जगात असल्या भाकड कथा श्रद्धा न वाढविता अंधश्रद्धा वाढविण्यात मदद करतात.आपण सारे सूज्ञ आहात,माझी या द्विधा मनस्थितीतून सुटका करावी अशी मी सर्व वडीलधारी मंडळीना या पत्रा द्वारे विनंती करतो.येथेच थाबतो.
कळावे,
लोभ आहेच,तो वाढवा,
आपला कृपाभिलाषी,
दिलीप सीताराम जाधव.
Wednesday, September 14, 2011
कोसुंब जिल्हा परिषद शाळा न. २ मावळतची वाडी २०१० आदर्श शाळा
कोसुंब जिल्हा परिषद शाळा न. २ मावळतची वाडी २०१० आदर्श शाळा म्हणून गौरवण्यात आले.ग्रामस्थाच्या सहभागामुळे शाळेला हे यश मिळू शकले.ज्या ज्या लोकांनी शाळेला मदत केली त्या सर्वांच्या अपेक्षा विधार्थी आणि शिक्षकांनी पुर्या केल्या.त्या सर्वांचे श्री जुगाई सेवा संघा तर्फे अभिनंदन.
कोसुंब गावचा शिमगोत्सव
कोसुंब गावचा शिमगोत्सव.
पालखीतील रूपे १८३४ साली नव्याने घडविण्यात आली |
श्री जुगाई,श्री सुकाई,श्री पडलकारीन,श्री वरदान,श्री माउली ची पालखी |
देवीची पालखी |
पालखी खाद्यावर घेऊन नाचताना बारभाई |
आशीर्वाद घेताना श्री व सौ दिलीप सी. जाधव. |
खणा नारळाने भरलेल्या देवींच्या ओट्या |
पालखी हातावर खेळवताना |
पालखी होमाभोवती मानकरी व बारभाई प्रदक्षिणा घालताना |
प्रदक्षिणा |
होम लागल्यावर पालखी खेलविताना |
फाक पंचमी पासून गावात होलीकोत्सव साजरा करायला सुरवात होते.कातळखळाच्या माळावर सर्व गावकरी जमतात आणि कोकड होळी पेटवतात.विविद म्हणजे हुतुतू,आटापाट्ट्या सारखे मर्दानी खेळ खेळतात.
दिंड्याची खोडे तापउन ती कातळावर आपटून फटाक्या सारखा आवाज येतो,पूर्वी फटाके म्हणून याचा वापर होत असे.फाल्गुन शुद्ध त्रयोदशीला (तेरशी) माड म्हणजे आंबा किंव्हा माडाचा उभे खोड तोडून ते हातावर झेलत नाचवत सहाणेवर आणले जाते.यासाठी खूप दमछाक होते,अडचणीच्या ठिकाणी जर ते असेल तर फार कष्ट होतात.पण सर्व जण उत्साहाने माड खेळवतात,सहाणेवर माड पाना-फुलांनी सजविला जातो,एका विशीष्ठ ठिकाणी छोटा खड्डा करून त्यात माड उभा केला जातो.माड उभा करण्यासाठी जाड वासे कैच्या करून टेकू लावतात.हि एक अजब कला आहे,त्या साठी ताकत आणि डोके वापरावे लागते.
दुसऱ्या दिवशी फाल्गुन शुध्द चतुर्दशीला सायंकाळी सर्व बारभाई श्री जुगाईच्या मंदिरात जमतात.देवींची चांदीची रूपे सोन्याच्या दागिन्यांनी सजविली जातात,ती पालखीत बसउन पालखी आकर्षकपणे सजविली जाते.पालखी रूपे बसविणे,ती सजवणे हि पण एक अवघड कला आहे,कारण पालखी नाचविताना रूपांना व सोम्बाचा पिंडीला कोठलाही धक्का लागणार नाही अशी काळजी घावी लागते.हि रूपे म्हणजे देविंचीच प्रतीरूपे असतात.या मागची संकल्पना अशी असावी कि,गावच्या रक्षणासाठी या ग्रामदेवता आपल्या सर्व देवता परिवारा समवेत प्रदक्षिणे साठी देवळा बाहेर पडतात.आपण काळजीपूर्वक याचा विचार केला तर पालखी गावतील सर्व ठिकाणी जाते व आपल्यातील शक्तीने ग्रामदेवता सर्व वाईट शक्तींना गावच्या सीमेबाहेर अटकाव करतात.याला रूढ अर्थाने सीमा बांधणे असे म्हणतात.लौव्किक पणे हे खरे असावे,तशीच धारणा सर्व कोकण प्रदेशात आहे.सनई,ढोल,तासे यांच्या तालावर पालखी नाचवत नाचवत सहाणेवर आणली जाते.
![]() |
कोसुंब गावची बारभाई विभागाची सहान(सहानेची वाडी ) |
फाल्गुन शुद्ध पौर्णिमा या दिवशी सायंकाळी सहाण भरते,म्हणजे सर्व बारभाई सहाणेवर जमतात.देवींची पालखी नाचवतात.रात्री मनाचे नमन (खेळे) होते,सर्वजण खेळे आवडीने पाहतात.हि लोककला जी थोडी फार जगली आहे ती या शिमगोत्स्वामुळे,(याच्या विषयी सविस्तर पोस्ट लिहीन).सर्व एकत्रित पणे खेळ्याची मजा लुटतात.
फाल्गुन वद्य प्रतीपदा या दिवशी सकाळी सर्व बारभाई सहाणेवर नटून सजून जमतात.आजचा दिवस मोठ्या आनंदाचा,पारंपारिक वेषात सजलेल्या माता,भगिनी,माहेरवासिनी,सासुरवासिनी,अबाल वृद्ध सारे वेगळ्याच उत्साहात एकमेकांना भेटतात,होळीच्या शुभेच्छा देतात.सहानेच्या मळीत गवताची होळी उभारण्यात येते,इतर ठिकाणी आपण लाकडाची होळी पाहतो,पण हि होळी गवताच्या गंजी रचून करतात.पाच मानकरी म्हणजे मोठ्या घराण्याचे प्रमुख व सर्व बारभाई समाज्याचे प्रमुख मानकरी,मधल्या घराण्याचे मानकरी,धाकट्या घराण्याचे मानकरी,सुतार मानकरी आणि कुणबी मानकरी होळीची पूजा करतात.पालखी नाचवत खेळवत होळी भोवती प्रदक्षिणा घालतात,नवीन लग्न झालेली जोडपी होळीला नारळ अर्पण करण्या साठी आवर्जून गावी येतात व आपले पुढील आयुष सुखी समाधानी व्हावे या साठी देवीला साकडे घालतात,तसेच गावातील वडिल धाऱ्यांचे आशीर्वाद घेतात.हे संस्कारित मूल्य आपण अजून जपले आहे. सर्व मानकरी माना प्रमाणे होमला अग्नी देतात.नारळ अर्पण करतात.सर्वजण होळीची पूजा करतात.पालखी पुन्ह्या मनसोक्त नाचविली जाते.यावेळी ओरडून देवीची महती गातात त्याला 'फाक' म्हणतात.नाचून झाल्यावर पालखी परत सहाणेवर आणतात.सर्व बारभाई,त्यांचे नातेवाईक पूजा करतात,नैवध्य,प्रसाद दाखवतात.माहेरवासिनी श्री पडलकरीन देवीची खाणा नारळाने ओटी भरतात.सासुरवासिनी श्री जुगाई व इतर देवतांच्या ओट्या भरून आशीर्वाद मागतात.सर्व पूज्या झाल्यावर आपले मोठे मानकरी देवीना जाप करतात आणि सर्वासाठी आशीर्वाद मागतात.सर्व नवस फेडले जातात.नवीन नवस बोलले जातात.रात्री नमनाचा(खेळे) कार्यक्रम मुंबईकरग्रामस्था तर्फे आयोजण्यात येतो.
फाल्गुन वध्य द्वितिया या दिवशी देवींचे विडे भरण्याचा विधी जंगम पुजाऱ्या मार्फत केला जातो.सर्व पाच मानकरी व बारभाई समवेत विडे भरल्यावर पालखी सहानेवरून शिपन्यासाठी प्रथम मोठ्या मानकरी श्री.दयारामदादा . यांचे कडे जाते.आपल्या देवींचे सर्व अधिकार या घरी आहेत.पालखी तेथून मधल्या मानकरी श्री.दीपक मनोहर (मळे वाडी) यांचे कडे जाते.तेथून पालखी धाकटे मानकरी श्री.सुभाष शंकर यांचे कडे पूजे साठी येते.मग पालखी सुतार मानकरी कडे जाते.त्या नंतर पालखी इतर बारभाई विभागातील फौजदार वाडी,मावळतची वाडी,सहानेची वाडी,श्री विठाबाई स्थान पूजा,कातळवाडी,पातालेवाडी,श्री तलेकरीन पूजा,सोंड वाडी,फुगीची वाडी,श्री पडलकरीन पूजा,तेथून श्री सुखाई पूजा,सर्व घरे व देवस्थानात पूजा झाल्यावर राखण दिली जाते व पालखीतील रूपे काढली जातात.दर तीन वर्षांनी देवींची मूळ स्थानके समजावली जातात,म्हणजे पालखी सवाद्ध मानकरी समवेत स्थानका कडे पालखी नेऊन पूजा केली जाते,परत देवळात पालखी आणून मूळ स्थानक व देवळातील देवी भेटविल्या जातात.(हेतू विषयी वेगळे विवेचन पुढील पोस्ट मध्ये).या प्रकारे आपल्या गावचा शिमगोत्सव साजरा केला जातो.
पालखी बारभाई विभागातील प्रत्येक घरात पूजे साठी नेली जाते.या मागील धारणा अशी आहे कि,देवी आपल्या घरात येऊन पुढील एका वर्षा साठी आपले रक्षण करते,आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करते.गुरव त्या प्रमाणे जाप करतात.सर्व घरातील सुहासिनी ओटी भरतात.
(मला असलेल्या माहिती प्रमाणे वरील लिखाण केले आहे,यात त्रुटी असू शकतात.जर कोणास अधिक माहिती असल्यास माझाशी संपर्क साधावा.)
फाल्गुन वध्य द्वितिया या दिवशी देवींचे विडे भरण्याचा विधी जंगम पुजाऱ्या मार्फत केला जातो.सर्व पाच मानकरी व बारभाई समवेत विडे भरल्यावर पालखी सहानेवरून शिपन्यासाठी प्रथम मोठ्या मानकरी श्री.दयारामदादा . यांचे कडे जाते.आपल्या देवींचे सर्व अधिकार या घरी आहेत.पालखी तेथून मधल्या मानकरी श्री.दीपक मनोहर (मळे वाडी) यांचे कडे जाते.तेथून पालखी धाकटे मानकरी श्री.सुभाष शंकर यांचे कडे पूजे साठी येते.मग पालखी सुतार मानकरी कडे जाते.त्या नंतर पालखी इतर बारभाई विभागातील फौजदार वाडी,मावळतची वाडी,सहानेची वाडी,श्री विठाबाई स्थान पूजा,कातळवाडी,पातालेवाडी,श्री तलेकरीन पूजा,सोंड वाडी,फुगीची वाडी,श्री पडलकरीन पूजा,तेथून श्री सुखाई पूजा,सर्व घरे व देवस्थानात पूजा झाल्यावर राखण दिली जाते व पालखीतील रूपे काढली जातात.दर तीन वर्षांनी देवींची मूळ स्थानके समजावली जातात,म्हणजे पालखी सवाद्ध मानकरी समवेत स्थानका कडे पालखी नेऊन पूजा केली जाते,परत देवळात पालखी आणून मूळ स्थानक व देवळातील देवी भेटविल्या जातात.(हेतू विषयी वेगळे विवेचन पुढील पोस्ट मध्ये).या प्रकारे आपल्या गावचा शिमगोत्सव साजरा केला जातो.
पालखी बारभाई विभागातील प्रत्येक घरात पूजे साठी नेली जाते.या मागील धारणा अशी आहे कि,देवी आपल्या घरात येऊन पुढील एका वर्षा साठी आपले रक्षण करते,आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करते.गुरव त्या प्रमाणे जाप करतात.सर्व घरातील सुहासिनी ओटी भरतात.
(मला असलेल्या माहिती प्रमाणे वरील लिखाण केले आहे,यात त्रुटी असू शकतात.जर कोणास अधिक माहिती असल्यास माझाशी संपर्क साधावा.)
Monday, September 12, 2011
गणेश उत्सव स्प्रिंग मिल कॉमपौंड २०११
श्री.उदय अनंत डावल यांचे मार्गदर्शना खाली हा देखावा बनविण्यात आला. |
चलत चित्र |
हिमालयातील कैलास पर्वत गणेश उत्सव स्प्रिंग मिल कॉमपौंड २०११ |
शिवतांडव |
शेषनाग |
प्रवेशद्वार |
Subscribe to:
Posts (Atom)