कोसुंब गाव संगमेश्वर पासून ७ कि.मी. वर आणि देवरुख पासून ३ कि.मी. वर वसले आहे.
गावात मुखत्वे करून मराठा समाजाची वस्ती आहे.त्यांची आडनावे जाधव अशी असून त्यांना
"यशवंतराव" हि पदवी शिवरायांच्या काळात बहाल करण्यात आली.
कोसुंब हे देवरुख या तालुका शहरापासून जवळ असल्याने वेगाने त्याचे रुपांतर लहान शहरात
होत आहे.पण त्याचा चेहरा मोहरा कोकणातील खेडे गावाचाच आहे,सर्व उत्सव अजून पारंपारिक
रूढी प्रमाणे साजरेकेले जातात.जागर,गणपती,नामसप्ताह,त्रिपुरारी पूर्णिमा,महाशिवरात्र ,होळी
(शिमगा) हे काही प्रमुख उत्सव आहेत.बहुतकरून गावकरी नोकरीसाठी मुंबई,रत्नागिरी सारखा
शहरात राहतात.पण उत्सवासाठी आपल्या आवडत्या देवांचा व गावदेवी जुगाईच्या पूजेसाठी
गावी आवर्जून येतात.
गावात मुखत्वे करून मराठा समाजाची वस्ती आहे.त्यांची आडनावे जाधव अशी असून त्यांना
"यशवंतराव" हि पदवी शिवरायांच्या काळात बहाल करण्यात आली.
कोसुंब हे देवरुख या तालुका शहरापासून जवळ असल्याने वेगाने त्याचे रुपांतर लहान शहरात
होत आहे.पण त्याचा चेहरा मोहरा कोकणातील खेडे गावाचाच आहे,सर्व उत्सव अजून पारंपारिक
रूढी प्रमाणे साजरेकेले जातात.जागर,गणपती,नामसप्ताह,त्रिपुरारी पूर्णिमा,महाशिवरात्र ,होळी
(शिमगा) हे काही प्रमुख उत्सव आहेत.बहुतकरून गावकरी नोकरीसाठी मुंबई,रत्नागिरी सारखा
शहरात राहतात.पण उत्सवासाठी आपल्या आवडत्या देवांचा व गावदेवी जुगाईच्या पूजेसाठी
गावी आवर्जून येतात.
"जुगाई सेवा संघ"ची स्थापना १९२३ साली मुंबई येथे झाली.गावातील उत्सव व धार्मिक कार्यक्रम
योग्य रित्या पार पडावेत व आपापसातील बंधूभाव वाढावा,हि कल्पना या मागे होती.हळूहळू
या भूमिकेत बदल होऊन संस्था शिक्षण,सामाजिक,क्रीडा क्षेत्रात हि कार्य करत आहे.
मी २००३ पासून "जुगाई सेवा संघाचा" प्रमुख सचिव म्हणून कार्य करीत असता जमवलेल्या
माहिती आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.
योग्य रित्या पार पडावेत व आपापसातील बंधूभाव वाढावा,हि कल्पना या मागे होती.हळूहळू
या भूमिकेत बदल होऊन संस्था शिक्षण,सामाजिक,क्रीडा क्षेत्रात हि कार्य करत आहे.
मी २००३ पासून "जुगाई सेवा संघाचा" प्रमुख सचिव म्हणून कार्य करीत असता जमवलेल्या
माहिती आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.
No comments:
Post a Comment