हृदयस्थ अजीतभाई जाधव
अजित जाधव यांच्या उत्तुंग कर्तुत्वाचे पैलू व वैचारिक पातळीचे दर्शन आपणा सर्वांस व्हावे,तसेच या कोसुंब गावच्या भूमिपुत्रास अभिवादन करण्याची हि विनम्र धडपड.
"आदित्याची झाडे / सदा सन्मुख सूर्याकडे//" या संत श्रेष्ठ ध्यनेश्वरांच्या वचना प्रमाणे अजीतभाईनी आपल्या नियोजित कार्यात स्व:ताला झोकून दिले,अजितचा जन्म कोसुंब गावी एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला.अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल ,बुरंबी (दादासाहेब सरफरे विधालय) येथे पूर्ण केले.शिक्षण घेत असतानाच त्यांची नाळ शाळेशी,समाजाशी व कोकणच्या मातीशी जोडली गेली.पुढील शिक्षण घेण्यासाठी ते मुंबईस आले.कष्टाने आणि सचोटीने व्यवसायात यश संपादन केले.पण त्यांचे मन मात्र शाळेतच गुंतले होते.ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांसाठी काहीतरी करावे हा विचार त्यांना स्वस्थ बसू देईना.
मुंबईत अपना बझार परिवारातील श्री.अशोकभाई व सुभाषभाई या सरफरे बंधूनी आपल्या चाणाक्ष नजरेने हि त्यांची तळमळ पहिली व त्यांचेवर बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या जनरल सेक्रेटरी पदाची जबाबदारी टाकली.ग्रामीण भागातील मुलांना शहरी मुलांप्रमाणे दर्जेदार शिक्षण मिळावे या दृष्टीकोनातून अद्यावत शाळेच्या इमारतीच्या बांधकामाचे शिवधनुष्य उचलले आणि सर्व अडचणींवर मात करत सर्व सहकार्यांना बरोबर घेत अवघ्या २ वर्षात शाळेची इमारत उभी केली.आज या संकुलात सर्व सुविधा मुलांना उपलब्ध असल्याने येथील विधार्थी ९०% पेक्षा जास्त गुण मिलउन तालुक्यात शालान्त परीक्षेत प्रथम येत आहेत.हीच खरी त्यांच्या कार्याची प्रचीती आहे.
सतत येणाऱ्या अडचणी व सततच्या दगदगीचा परिणाम त्याचे शरीरावर झाला.पण हाती घेतलेले कार्य तडीस नेण्याच्या ध्यासाने त्यांनी आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केले,मोठ्या आजाराने ते ग्रस्त झाले.इस्पितळात दाखल करावे लागले.अखेर ९ सप्टेंबर २००९ रोजी ते अनंतात विलीन झाले.आज हा कोसुंबचा सुपुत्र शरीराने आपल्यात नसला तरी त्याचा कार्याने शाळेच्या रुपात सतत आपल्यात वावरतो आहे.शाळेतून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक विध्यार्थाचे रूपाने तो सर्वाना दिसणार आहेत. श्री जुगाई सेवा संघाचा हा कार्यकर्ता त्याच्या कार्यामुळे अमर झाला आहे.संघा तर्फे त्यांचे नावे शालान्त परीक्षेत पंचक्रोषित प्रथम येणाऱ्या विधार्थ्यास पारितोषक देण्यात येते,२०१० व २०११ या दोन्ही वर्षी हा मान दादासाहेब सरफरे शाळेतील विधार्थ्याना मिळाला,हीच खरी त्यांना मूक श्रद्धांजली व त्यांचे जीवन फलित आहे.
दिलीप जाधव.
(श्री विष्णू मारुती कांबळे यांचे लेखावरून)